शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धानाचे उत्पादन घटणार रबीचे वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 22:15 IST

हवामानात प्रचंड तापमान वाढीचा फटका धान पिकाला बसला असून विपरित वातावरण बदलामुळे अनेक भागात धानाचे लोंब लालसर पडून लोंबाच्या टोकाला काळपट, पोचट, दाणे आलेले आहे.

ठळक मुद्देवातावरणाचा परिणाम : तालुका कृषी विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : हवामानात प्रचंड तापमान वाढीचा फटका धान पिकाला बसला असून विपरित वातावरण बदलामुळे अनेक भागात धानाचे लोंब लालसर पडून लोंबाच्या टोकाला काळपट, पोचट, दाणे आलेले आहे. तुडतुड्याचा प्रचंड प्रादुर्भाव धान पिकावर झाल्याने यंदा धानाचे उत्पादन घटणार आहे. परंतु आत्तापासूनच थंडीला जोर धरल्याने रबी पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरमोरीचे तालुका कृषी अधिकारी एस. पी. ढोणे यांनी लोकमतला दिली.वैरागड येथील एका शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी एस. पी. ढोणे, कृषी अधिकारी एल. ए. कटरे, कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर आले होते. ते पुढे म्हणाले, वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्याने जागतिक तापमान वाढ झाली. हवामान बदलामुळे खरीपाच्या पिकांवर रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. ढगाळ वातावरण अवेळी पाऊस अशी स्थिती यावर्षी राहिली. पूर्वी नोव्हेंबर ते फेब्रुवारी चार महिने थंडी असायची. या वर्षात नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच थंडी पडण्यास सुरूवात झाली असल्याने रबी हंगामातील तूर, उळीद, मूग, जवस, सूर्यफूल व अन्य कडधान्य पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी केवळ धानाचे पीक घेण्याऐवजी गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घ्यावे, अधिक नफा मिळवावा, असेही कृषी अधिकाºयांनी सांगितले.