शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

रबी पिकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:38 IST

सप्टेबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरणी करूनही पीक हाती येणार नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी थांबविली आहे.

ठळक मुद्देलागवडीचे क्षेत्र घटणार : अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सप्टेबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरणी करूनही पीक हाती येणार नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी थांबविली आहे. त्यामुळे यावर्षी रबी पिकांचे क्षेत्र घटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण २८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी २२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी धानपीक निघल्यानंतर त्याच धानाच्या बांधीत रबी पिकांची लागवड करतात. यासाठी मात्र जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पावसाने सप्टेंबर महिन्यापासून उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. त्यामुळे पिकाची पेरणी करणे शक्य नाही. जवळपासचे नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी सुध्दा मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे सिंचन करणेही शक्य नसल्याचे दिसून येते.रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा, लाखोळी, मुग, उडीद, बरबटी, कुरता, पोपट, जवस, भूईमूग, गहू, मका या पिकांची लागवड केली जाते. रबी पिकांचे उत्पादन कमी असले तरी या पिकांच्या लागवडीचा खर्च सुध्दा कमी आहे. त्यामुळे त्याचबरोबर धानपीक निघल्यानंतर शेती पडीक राहण्याऐवजी या पिकांची लागवड केली जाते. पूर्वी ज्वारी, जवस या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र या पिकांचे उत्पादन अतिशय कमी होत असल्याने शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे. मका पिकाला गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन योग्य आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाला पसंती देत असून दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागील वर्षी सुमारे तीन हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली होती. यावर्षी मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.कडधान्याचे क्षेत्र घटलेकडधान्यामध्ये मूग, उडीद, बरबटी, कुरता, चवळी, वाल, पोपट यांचा समावेश होतो. मात्र शेतकरी या पिकांकडे पाठ फिरवित इतर नगदी पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. मूग, उडीदाचे उत्पादन होणाऱ्या जमिनीत आता सोयाबिन, कापूस या पिकांची लागवड केली जात आहे. कापूस पीक जवळपास मार्चपर्यंत राहत असल्याने रबी पिकांची लागवड करणे शक्य होत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती