शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

१० मिनिटांपूर्वी मिळणार प्रश्नपत्रिका

By admin | Updated: February 19, 2015 01:40 IST

२१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची व ३ मार्चपासून इयत्ता १० वीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी १० मिनिटापूर्वी ...

गडचिरोली : २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची व ३ मार्चपासून इयत्ता १० वीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी १० मिनिटापूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी घेतला आहे. त्यामुळे सर्व केंद्रावरील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना १० मिनिटापूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे, अशी माहिती जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली आहे. परीक्षेची वेळ सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटाच्या आधी परीक्षादालनात विद्यार्थ्यांनी प्रवेश करावा, सर्व केंद्रांवरील परीक्षा खोलीत २० मिनिटापूर्वी विद्यार्थ्यांना बारकोड व स्टिकरसह उत्तरपत्रिका देण्यात येईल. त्यानंतर पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना बारकोड व स्टिकरची माहिती विद्यार्थ्यांना देतील. त्यानंतर पेपर सुरू होण्याच्यापूर्वी १० मिनिटाच्या आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल, अशीही माहिती शिक्षणाधिकारी नरड यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व परीक्षक, केंद्रसंचालक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शिक्षणाधिकारी नरड यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.