शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

By संजय तिपाले | Updated: December 21, 2023 17:09 IST

तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

संजय तिपाले,गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे खाणविरोधी आंदोलन उधळून लावल्यानंतर संतापलेल्या नक्षल्यांनी पोलिस खबरी असल्याच्या संशयावरुन तीन निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतर २१ डिसेंबरला पत्रक जारी केले. यात थेट अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे दमकोंडवाहीच्या प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत २५० दिवसांपासून आंदोलन सुरु होते. तेथून जवळच असलेल्या वांगेतुरी येथे २० नोव्हेंबरला पोलिसांनी मदतकेंद्र स्थापन केले. यावेळी आंदोलन व पोलिस आमने- सामने आले. यानंतर पोलिसांनी आंदोलन उधळून लावले. दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीला ११ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खाणविरोधी भूमिकेला समर्थन दिले होते. मात्र, नंतर सत्तानाट्यात त्यांना मंत्रिपद मिळाले. आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला, २१ जणांना ताब्यात घेतले. मात्र, मंत्री आत्राम हे मौन धारण करुन बसले आहेत. आता मंत्री आत्राम यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकाद्वारे केले आहे.

मंत्री आत्राम यांनी कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी धारण केलेले मौन योग्य नाही, त्यांनी मौन सोडावे. मंत्रिपद केवळ आठ महिन्यांसाठीच आहे. यासाठी जनतेची परीक्षा पाहू नये अन्यथा जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्रीनिवास याने दिला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिसांवरील आरोप फेटाळून लावले. या पत्रकाचे विश्लेषण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

बोदीनटोला चकमकीचा निषेध :

बोदीनटोला (ता.धानोरा) येथे १४ डिसेंबरला दोन नक्षल्यांचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला होता.याचा उल्लेख करत या पत्रकात पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित करुन निषेध नोंदविला आहे. १४ डिसेंबरला पोलिस व नक्षल्यांत चकमक झाली होती. यात जहाल नक्षलवादी दुर्गेश वट्टे व राकेश हे दोघे ठार झाले होते. चार वर्षांपूर्वी जांभुळखेडा येथील स्फोटात १५ पोलिस शहीद झाले होते. या स्फोटाचा दुर्गेश वट्टे हा मास्टरमाईंड होता. तथापि, नक्षल्यांनी स्वतंत्र पत्रक काढून मृत दोन नक्षल्यांची पार्श्वभूमी विषद केली आहे.

या जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.  या पत्रकाला मी महत्त्व देत नाही. या भागाचा विकास करणे याला मी प्राधान्य देतो.- धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीStrikeसंप