शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

By संजय तिपाले | Updated: December 21, 2023 17:09 IST

तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

संजय तिपाले,गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे खाणविरोधी आंदोलन उधळून लावल्यानंतर संतापलेल्या नक्षल्यांनी पोलिस खबरी असल्याच्या संशयावरुन तीन निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतर २१ डिसेंबरला पत्रक जारी केले. यात थेट अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे दमकोंडवाहीच्या प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत २५० दिवसांपासून आंदोलन सुरु होते. तेथून जवळच असलेल्या वांगेतुरी येथे २० नोव्हेंबरला पोलिसांनी मदतकेंद्र स्थापन केले. यावेळी आंदोलन व पोलिस आमने- सामने आले. यानंतर पोलिसांनी आंदोलन उधळून लावले. दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीला ११ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खाणविरोधी भूमिकेला समर्थन दिले होते. मात्र, नंतर सत्तानाट्यात त्यांना मंत्रिपद मिळाले. आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला, २१ जणांना ताब्यात घेतले. मात्र, मंत्री आत्राम हे मौन धारण करुन बसले आहेत. आता मंत्री आत्राम यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकाद्वारे केले आहे.

मंत्री आत्राम यांनी कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी धारण केलेले मौन योग्य नाही, त्यांनी मौन सोडावे. मंत्रिपद केवळ आठ महिन्यांसाठीच आहे. यासाठी जनतेची परीक्षा पाहू नये अन्यथा जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्रीनिवास याने दिला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिसांवरील आरोप फेटाळून लावले. या पत्रकाचे विश्लेषण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

बोदीनटोला चकमकीचा निषेध :

बोदीनटोला (ता.धानोरा) येथे १४ डिसेंबरला दोन नक्षल्यांचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला होता.याचा उल्लेख करत या पत्रकात पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित करुन निषेध नोंदविला आहे. १४ डिसेंबरला पोलिस व नक्षल्यांत चकमक झाली होती. यात जहाल नक्षलवादी दुर्गेश वट्टे व राकेश हे दोघे ठार झाले होते. चार वर्षांपूर्वी जांभुळखेडा येथील स्फोटात १५ पोलिस शहीद झाले होते. या स्फोटाचा दुर्गेश वट्टे हा मास्टरमाईंड होता. तथापि, नक्षल्यांनी स्वतंत्र पत्रक काढून मृत दोन नक्षल्यांची पार्श्वभूमी विषद केली आहे.

या जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.  या पत्रकाला मी महत्त्व देत नाही. या भागाचा विकास करणे याला मी प्राधान्य देतो.- धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीStrikeसंप