शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:18 IST

महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देतीव्र विरोधानंतरही काम सुरू : नागरिकांना विश्वासात न घेता तेलंगणासाठी प्रशासनाच्या पायघड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर होत असलेल्या या जनसुनावणीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच या प्रकल्पाला असलेला नागरिकांचा विरोध पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोठ्या प्रकल्पामुळे तेलंगणातील हजारो हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्टÑातील हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पण त्या विरोधाला न जुमानता या प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारने सुरूही केले आहे.गोदावरील लवादानुसार महाराष्टÑातून वाहणाºया गोदावरी, प्राणहिता या नद्यांच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क असला तरी त्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याशिवाय राज्य शासनाच्या वतीने रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र त्याला न जुमानता तेलंगणा सरकार मनमानी करून जनभावनेचा अनादर करीत आहे. तरीही राज्य शासनातील लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी कोणताही आक्षेप न घेता तेलंगणा सरकारच्या तालावर नाचत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकल्पात आपली शेतजमीन जाऊन गावेही उठविली जाणार हे समजल्यानंतर नागरिकांचा विरोध वाढू लागला. मोर्चेही काढण्यात आले. पण प्रशासनातील अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी अशा कोणीच त्यांचा आवाज ऐकला नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सर्वकाही ‘सेट’ केल्याचे काही जाणकार सांगतात.ंवरातीमागून घोडे कशासाठी?कोणत्याही प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याआधीच प्रकल्पग्रस्त नागरिकांची जनसुनावणी घेऊन त्यांच्या अपेक्षा ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, त्यांचा विरोध शांततेच्या मार्गाने शमविणे गरजेचे असते. पण मेडीगट्टा प्रकल्पाच्या बाबतीत मात्र पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे. जनभावनेचा आदर न करता आधीच भूमिपूजन कार्यक्रम उरकून सर्व कामे सुरू करण्यात आली. असे असताना आता जनसुनावणीची औपचारिकता पूर्ण करून ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.फायदा काय? प्रशासनच अनभिज्ञया प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसणार आहे. त्यांना विस्थापित होण्यासोबतच त्यांची शेतजमिनही पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा वापर मात्र तेलंगणातील शेतकºयांना करता येणार आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांची किती जमीन या प्रकल्पात जाणार, महाराष्टÑातील किती हेक्टर शेतजमिनीला या प्रकल्पाचा फायदा होणार, धरणाची उंची किती राहणार, प्रकल्पग्रस्तांना मोबदला किती मिळणार, इतर काय फायदे मिळणार याबाबत महाराष्टÑ शासनाच्या संबंधित यंत्रणांकडेही पुरेशी माहिती नाही. असे असतानाही जिल्हा प्रशासन यासंदर्भात तेलंगणाच्या हिताची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. यासंदर्भात खरंच प्रशासनाकडे माहिती नाही, की प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.