शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:18 IST

महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देतीव्र विरोधानंतरही काम सुरू : नागरिकांना विश्वासात न घेता तेलंगणासाठी प्रशासनाच्या पायघड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर होत असलेल्या या जनसुनावणीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच या प्रकल्पाला असलेला नागरिकांचा विरोध पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोठ्या प्रकल्पामुळे तेलंगणातील हजारो हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्टÑातील हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पण त्या विरोधाला न जुमानता या प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारने सुरूही केले आहे.गोदावरील लवादानुसार महाराष्टÑातून वाहणाºया गोदावरी, प्राणहिता या नद्यांच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क असला तरी त्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याशिवाय राज्य शासनाच्या वतीने रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र त्याला न जुमानता तेलंगणा सरकार मनमानी करून जनभावनेचा अनादर करीत आहे. तरीही राज्य शासनातील लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी कोणताही आक्षेप न घेता तेलंगणा सरकारच्या तालावर नाचत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकल्पात आपली शेतजमीन जाऊन गावेही उठविली जाणार हे समजल्यानंतर नागरिकांचा विरोध वाढू लागला. मोर्चेही काढण्यात आले. पण प्रशासनातील अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी अशा कोणीच त्यांचा आवाज ऐकला नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सर्वकाही ‘सेट’ केल्याचे काही जाणकार सांगतात.ंवरातीमागून घोडे कशासाठी?कोणत्याही प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याआधीच प्रकल्पग्रस्त नागरिकांची जनसुनावणी घेऊन त्यांच्या अपेक्षा ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, त्यांचा विरोध शांततेच्या मार्गाने शमविणे गरजेचे असते. पण मेडीगट्टा प्रकल्पाच्या बाबतीत मात्र पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे. जनभावनेचा आदर न करता आधीच भूमिपूजन कार्यक्रम उरकून सर्व कामे सुरू करण्यात आली. असे असताना आता जनसुनावणीची औपचारिकता पूर्ण करून ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.फायदा काय? प्रशासनच अनभिज्ञया प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसणार आहे. त्यांना विस्थापित होण्यासोबतच त्यांची शेतजमिनही पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा वापर मात्र तेलंगणातील शेतकºयांना करता येणार आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांची किती जमीन या प्रकल्पात जाणार, महाराष्टÑातील किती हेक्टर शेतजमिनीला या प्रकल्पाचा फायदा होणार, धरणाची उंची किती राहणार, प्रकल्पग्रस्तांना मोबदला किती मिळणार, इतर काय फायदे मिळणार याबाबत महाराष्टÑ शासनाच्या संबंधित यंत्रणांकडेही पुरेशी माहिती नाही. असे असतानाही जिल्हा प्रशासन यासंदर्भात तेलंगणाच्या हिताची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. यासंदर्भात खरंच प्रशासनाकडे माहिती नाही, की प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.