शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:18 IST

महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देतीव्र विरोधानंतरही काम सुरू : नागरिकांना विश्वासात न घेता तेलंगणासाठी प्रशासनाच्या पायघड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर होत असलेल्या या जनसुनावणीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच या प्रकल्पाला असलेला नागरिकांचा विरोध पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोठ्या प्रकल्पामुळे तेलंगणातील हजारो हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्टÑातील हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पण त्या विरोधाला न जुमानता या प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारने सुरूही केले आहे.गोदावरील लवादानुसार महाराष्टÑातून वाहणाºया गोदावरी, प्राणहिता या नद्यांच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क असला तरी त्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याशिवाय राज्य शासनाच्या वतीने रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र त्याला न जुमानता तेलंगणा सरकार मनमानी करून जनभावनेचा अनादर करीत आहे. तरीही राज्य शासनातील लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी कोणताही आक्षेप न घेता तेलंगणा सरकारच्या तालावर नाचत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकल्पात आपली शेतजमीन जाऊन गावेही उठविली जाणार हे समजल्यानंतर नागरिकांचा विरोध वाढू लागला. मोर्चेही काढण्यात आले. पण प्रशासनातील अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी अशा कोणीच त्यांचा आवाज ऐकला नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सर्वकाही ‘सेट’ केल्याचे काही जाणकार सांगतात.ंवरातीमागून घोडे कशासाठी?कोणत्याही प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याआधीच प्रकल्पग्रस्त नागरिकांची जनसुनावणी घेऊन त्यांच्या अपेक्षा ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, त्यांचा विरोध शांततेच्या मार्गाने शमविणे गरजेचे असते. पण मेडीगट्टा प्रकल्पाच्या बाबतीत मात्र पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे. जनभावनेचा आदर न करता आधीच भूमिपूजन कार्यक्रम उरकून सर्व कामे सुरू करण्यात आली. असे असताना आता जनसुनावणीची औपचारिकता पूर्ण करून ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.फायदा काय? प्रशासनच अनभिज्ञया प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसणार आहे. त्यांना विस्थापित होण्यासोबतच त्यांची शेतजमिनही पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा वापर मात्र तेलंगणातील शेतकºयांना करता येणार आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांची किती जमीन या प्रकल्पात जाणार, महाराष्टÑातील किती हेक्टर शेतजमिनीला या प्रकल्पाचा फायदा होणार, धरणाची उंची किती राहणार, प्रकल्पग्रस्तांना मोबदला किती मिळणार, इतर काय फायदे मिळणार याबाबत महाराष्टÑ शासनाच्या संबंधित यंत्रणांकडेही पुरेशी माहिती नाही. असे असतानाही जिल्हा प्रशासन यासंदर्भात तेलंगणाच्या हिताची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. यासंदर्भात खरंच प्रशासनाकडे माहिती नाही, की प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.