शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

१० लाभार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान

By admin | Updated: June 1, 2016 02:04 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरूष व स्त्रीचा मृत्यू झाल्यास २० हजार रूपये अर्थसहाय्य देण्याची योजना आहे.

प्रत्येकी २० हजार : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभआरमोरी : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरूष व स्त्रीचा मृत्यू झाल्यास २० हजार रूपये अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत आरमोरी तहसील कार्यालयातर्फे तालुक्यातील एकूण १० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपये प्रमाणे दोन लाख रूपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. यासंदर्भात आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांच्या उपस्थितीत सोमवारी तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. नैताम, अव्वल कारकून हेमलता मसराम उपस्थित होत्या. याप्रसंगी सुमित्रा जगन सयाम रा. कासवी, पौर्णिमा लोमेश बोबाटे रा. सिर्सी, मधुकर बालाजी सराटे रा. नरोटी माल, सरिता नामदेव नेवारे रा. इंजेवारी, इंदिरा लालाजी भोयर रा. कुलकुली, सिंधू खुशाल पुंगाटे रा. देवखडकी, मधुकर मोतीराम मडावी रा. कुलकुली, जिजाबाई कांता हुलके रा. देलोडा (बु.), उर्मिला माणिकराव शिलार रा. रवी व विलास माणिक अलोणे रा. अरसोडा या १० लाभार्थ्यांना तहसीलदार मनोहर वलथरे यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. सदर १० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मे २०१६ मध्ये मंजूर करण्यात आले. आरमोरी तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य व इतर निराधार योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)