शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आधी रोजगार द्या, मग कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:10 IST

‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही.

ठळक मुद्देपानठेलेधारकांची भूमिका : प्रशासनाच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही. असे असताना उदरनिर्वाहासाठी पानठेले सुरू केले तर त्यावरही गदा आणली जात आहे. मग आम्ही जगायचे कसे?’ असा सवाल करीत गडचिरोली शहरातील पानठेलेधारकांनी आधी आम्हाला रोजगार द्या, मग खुशाल कारवाई करा, अशी भूमिका घेतली आहे.नगर परिषदेच्या वतीने कोटपा कायद्यांतर्गत शहरातील पानठेलेधारकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी पत्रकारांपुढे आपली व्यथा मांडली. कारवाईचा निषेध म्हणून गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी आपले पानठेले पूर्णपणे बंद ठेवले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आपली भूमिका सांगताना त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दलही नाराजी व्यक्त केली. आम्हाला न्याय मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडे गेलो असता त्यांच्याकडूनही निराशाच पदरी पडल्याचे त्यांनी सांगितले. इतर जिल्ह्यांमध्ये कारवाई होत नाही, मग गडचिरोलीतच का? याचा विचार करावआ अशी मागणी रूचित वांढरे व पानठेलेधारकांनी केली.कारवाई करण्यापूर्वी नगर प्रशासनाने कोणतीही नोटीस दिली नसल्याचेही पानठेलेधारकांच्या वतीने रविंद्र अवथडे, इम्रान शेख, मोरेश्वर मानपल्लीवार, निलेश वालदे आदींनी सांगितले.