शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:38 IST

शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : धानोरा येथे कामगार नोंदणी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ तथा अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्था यांच्या माध्यमातून अटल विश्वकर्मा सन्मान योजना १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कामगार नोंदणी अभियान राबविले जात आहे. सदर मेळावा धानोरातही आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी मार्गदर्शन करीत होते. शिबिराला तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा कामगार अधिकारी रवींद्र उईके, अनुलोम संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, सारंग साळवे, भाग जनसेवक रवी कोल्हटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कामगार उपस्थित होते. पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.नोंदणी झालेल्या कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार गणवीर म्हणाले, ही योजना समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून निर्माण करण्यात आले आहे. कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कामगार अधिकारी रवींद्र उईके म्हणाले की, मोठ्या संख्येने कामगारांनी नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरीही ज्या नागरिकांना या योजनेविषयी माहिती नाही. त्यांच्यापर्यंत इतर नागरिकांनी माहिती पोहोचवून त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी