शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:38 IST

शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : धानोरा येथे कामगार नोंदणी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ तथा अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्था यांच्या माध्यमातून अटल विश्वकर्मा सन्मान योजना १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कामगार नोंदणी अभियान राबविले जात आहे. सदर मेळावा धानोरातही आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी मार्गदर्शन करीत होते. शिबिराला तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा कामगार अधिकारी रवींद्र उईके, अनुलोम संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, सारंग साळवे, भाग जनसेवक रवी कोल्हटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कामगार उपस्थित होते. पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.नोंदणी झालेल्या कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार गणवीर म्हणाले, ही योजना समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून निर्माण करण्यात आले आहे. कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कामगार अधिकारी रवींद्र उईके म्हणाले की, मोठ्या संख्येने कामगारांनी नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरीही ज्या नागरिकांना या योजनेविषयी माहिती नाही. त्यांच्यापर्यंत इतर नागरिकांनी माहिती पोहोचवून त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी