शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:38 IST

शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : धानोरा येथे कामगार नोंदणी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ तथा अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्था यांच्या माध्यमातून अटल विश्वकर्मा सन्मान योजना १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कामगार नोंदणी अभियान राबविले जात आहे. सदर मेळावा धानोरातही आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी मार्गदर्शन करीत होते. शिबिराला तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा कामगार अधिकारी रवींद्र उईके, अनुलोम संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, सारंग साळवे, भाग जनसेवक रवी कोल्हटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कामगार उपस्थित होते. पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.नोंदणी झालेल्या कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार गणवीर म्हणाले, ही योजना समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून निर्माण करण्यात आले आहे. कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कामगार अधिकारी रवींद्र उईके म्हणाले की, मोठ्या संख्येने कामगारांनी नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरीही ज्या नागरिकांना या योजनेविषयी माहिती नाही. त्यांच्यापर्यंत इतर नागरिकांनी माहिती पोहोचवून त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी