शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन : गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर, दुपारी सर्वच मार्गावर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचे तापमान ४२ सेल्सिअस अंशावर गेले असल्याने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराचे तापमान संतुलीत ठेवावे. मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते. मानवी शरीराच्या तापमान समतोल राखण्याची क्रिया संपुष्टात आल्यानंतर बेशुध्दावस्था येते. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तिव्र तापमानामध्ये शरीराचे तापमान वाढते. डोकेदुखी, चक्कर येणे, कमजोरपणा वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खुप तहाण लागणे, उष्णता असूनही घाम कमी येणे, उलट्या होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.बाह्य उष्माघात व परंपरांगत उष्माघात असे उष्माघाताचे प्रकार आहेत. बाह्य उष्माघात हा खेळाडू, सैनिक, शेतात व उन्हात काम करणारे मजुर, दुचाकी प्रवास करणाऱ्यांना होऊ शकतो. तर वयोवृध्द, लठ्ठपणा, मधुमेह असणाऱ्यांना परंपरांगत उष्माघात होऊ शकतो, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रूडे यांनी सांगितले.उष्माघातात अशी घ्या काळजीउष्माघाताचा रुग्ण आढळल्यानंतर रुग्णास लगेच रुग्णालयात दाखल करावे. उष्माघाताच्या रुग्णाला सर्वप्रथम उष्णतेच्या ठिकाणापासून थंड ठिकाणी किंवा सावलीच्या जागेत हलवावे. रुग्णाचे डोके व पाठीचा भाग समांतरपेक्षा थोडा उंचावर असेल अशा स्थितीत ठेवाव. त्यानंतर डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फाची पिशवी ठेवावी. यानंतर थोड्या-थोड्या अंतराने थंड पाणी पिण्यास द्यावे. दरम्यानच्या काळात गरम किंवा उत्तेजीत पदार्थ अजिबात देऊ नये. रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर थंड पाण्याचे टॉवेल, बेडशिट, पांढरे कापड ठेवावे.रुग्ण बेशुध्दावस्थेत असल्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे. रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी व तात्काळ उपाययोजनेकरिता सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य पथक येथील वैद्यकिय अधिकाºयांनी व खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाºयांनी आपल्या रुग्णालयामध्ये आवश्यक ती पूर्व तयारी करुन ठेवावी. शितकक्ष, हवेशिर खोलीमध्ये पंखे, कुलर आदी वातानुकूलीत साहित्य उपलब्ध ठेवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल जे.रुडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंशीकांत शंभरकर यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर