शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रबी पिकांचे अळींपासून संरक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:19 IST

रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा,

ठळक मुद्देकीटकशास्त्र विभागाचे आवाहन : हरभरा, तूर व कपासीवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कीटकशास्त्र विभागाने केले आहे.हरभरा पिकाचे घाटेअळीपासून संरक्षण करण्याकरिता एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यास किडींचे कोष पक्षी वेचून खातात तसेच उन्हामुळे ते मरतात. गहू, मसूर, मोहरी, जवस आदी आंतर पीक घेतल्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच शत्रू कीटकांचाही वापर केल्यास अळींचा बंदोबस्त करता येतो. तुरीवरील अळींचा बंदोबस्त करण्याकरिता प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतात उभारावे, तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलविल्यास अळ्या खाली पडतात. कपासीमधील अंबाडीवर्गीय पर्यायी वनस्पतीचा नायनाट केल्यास रोगावर नियंत्रण आणता येतो.घाटेअळीपासून हरभºयाला धोकाहरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीची मादी हरभºयांच्या पानावर अंडी घालते. दोन ते तीन दिवसात अळी अंड्यातून बाहेर येते. त्यानंतर अळ्या हरभºयाचे आतील दाणे पोखरतात. एक अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते. यावर पायबंद घालण्यासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अ‍ॅझॅडीरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रती १० लीटर पाणी किंवा ५०० एलई व ५० ग्रॅम राणीपाल तसेच ब्युव्हेरिया बॅसियाना व जैवीक बुरशीनाशकाची ६० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.शेंगा पोखरणाºया अळींच्या प्रादुर्भावापासून तुरीचा असा करा बचावतूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी वेळीच उपययोजना करणे गरजेचे असते. तसेच पिसारी पतंग, शेंगे माशी आदी अळ्या व कीटकांचाही प्रादुर्भाव होतो. या तिन्ही अळ्यांवर एकच उपाय केला तरी रोग नायनाट होऊ शकतो. कळी अवस्थेत पहिली फवारणी निम कीटकनाशकाची (अ‍ॅझाडिरेक्टीन ३०० पीपीएम, ५० मिली/१० लिटर पाणी) करावी. तसेच क्निालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली किंवा इथियॉन ५० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.कपासीवर लाल ढेकणेबिटी कपासीवर लाल ढेकण्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीच्या काळात उमलत्या बोंडांमधून ढेकणे रस शोषून घेतात. काही प्रमाणात बोंडे उमलत नाही. वाट झालेले बोंडे गळून पडतात. तसेच गर्द तपकिरी रंगाची होतात. त्यामुळे यावर पायबंद घालण्यासाठी फ्लूव्हॅलीनेट २५ टक्के प्रवाहीत ४ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, फवारणी करण्यापूर्वी फुटलेले बोंड वेचून घ्यावे, तसेच झाडावरून दोर फिरवून समूहाने ढेकणे केरोसीनच्या पाण्यात सोडावे.