शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावा

By admin | Updated: October 15, 2016 01:37 IST

दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने

अहेरी : दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने कमी वेळात मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांना दिले. महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या नियोजनाबाबत शुक्रवारी अहेरीच्या नगर पंचायत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बैठकीला अहेरीचे तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी मुद्रा लोन, अपंगांच्या समस्या, घरकूल लाभार्थ्यांच्या अडचणी, कर्ज वाटप, परवाना, सिंचन समस्या, विविध प्रकारची दाखले, कृषी साहित्य वाटप, वीज समस्या, विद्यार्थ्यांसाठीची एसटी पास योजना, वनहक्क पट्टे, रस्ते, आरोग्य सुविधा याबाबतची माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनांची अंमलबजावणी, अपंगांना तीनचाकी सायकल वाटप आदींचाही आढावा त्यांनी घेतला. पुढील महिन्यात महसूल विभागातर्फे अहेरी येथे महाराजस्व अभियान घेण्यात येणार आहे. या शिबिरात अहेरी उपविभागातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, तसेच काही नवीन योजना अंमलात आणाव्या, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. सदर बैठकीचे आभार तलाठी चांदेकर यांनी केले. अहेरी उपविभागातील एकूण १६ हजार ३८३ लाभार्थ्यांना समाधान शिबिराचा लाभ देण्यात आल्याबद्दल पालकमंत्री आत्राम यांनी महसूल व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदर आढावा बैठकीला समाजकल्याण, वन, कृषी, पंचायत समिती, उपप्रादेशिक परिवहन, भूमी अभिलेख, आरोग्य, आदिवासी विकास प्रकल्प, विद्युत, विविध राष्ट्रीयकृत बँक तसेच एसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)