शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावा

By admin | Updated: October 15, 2016 01:37 IST

दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने

अहेरी : दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने कमी वेळात मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांना दिले. महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या नियोजनाबाबत शुक्रवारी अहेरीच्या नगर पंचायत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बैठकीला अहेरीचे तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी मुद्रा लोन, अपंगांच्या समस्या, घरकूल लाभार्थ्यांच्या अडचणी, कर्ज वाटप, परवाना, सिंचन समस्या, विविध प्रकारची दाखले, कृषी साहित्य वाटप, वीज समस्या, विद्यार्थ्यांसाठीची एसटी पास योजना, वनहक्क पट्टे, रस्ते, आरोग्य सुविधा याबाबतची माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनांची अंमलबजावणी, अपंगांना तीनचाकी सायकल वाटप आदींचाही आढावा त्यांनी घेतला. पुढील महिन्यात महसूल विभागातर्फे अहेरी येथे महाराजस्व अभियान घेण्यात येणार आहे. या शिबिरात अहेरी उपविभागातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, तसेच काही नवीन योजना अंमलात आणाव्या, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. सदर बैठकीचे आभार तलाठी चांदेकर यांनी केले. अहेरी उपविभागातील एकूण १६ हजार ३८३ लाभार्थ्यांना समाधान शिबिराचा लाभ देण्यात आल्याबद्दल पालकमंत्री आत्राम यांनी महसूल व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदर आढावा बैठकीला समाजकल्याण, वन, कृषी, पंचायत समिती, उपप्रादेशिक परिवहन, भूमी अभिलेख, आरोग्य, आदिवासी विकास प्रकल्प, विद्युत, विविध राष्ट्रीयकृत बँक तसेच एसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)