शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

हेक्टरी ३३ क्विंटल धानाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:11 IST

बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे प्रात्यक्षिक : मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती चांगली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता मोठा सिंचन प्रकल्प नाही. मात्र धानपिकाला अगदी सुरुवातीपासून सिंचनाची गरज राहत असल्याने गावपातळीवर मामा तलाव व बोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तलाव व बोड्यांच्या माध्यमातून सिंचन उपलब्ध करून दिले जाते. ज्या धानाला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा धानाला बागायत क्षेत्रातील धान समजले जाते. सुरुवातीपासून सिंचन सुविधा उपलब्ध होत असल्याने सादर धानाचे पीक चांगले येते. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादनही अधिक होते.बागायत क्षेत्रातील धानाच्या उत्पादनाची सरासरी काढण्यासाठी जिल्हाभरात १३० प्लॉट (१० मीटर चौरस धानाची जागा) टाकण्यात आले. या सर्व प्लॉटची सरासरी ३३.१२ क्विंटल येते.ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा धानाला जिरायती धान समजले जाते. असे शेतकरी कमी कालावधीत परिपक्व होणारे धान टाकतात. या धानाची उत्पादकता निश्चितच कमी राहते. यावर्षी जिरायती क्षेत्रातील धानाची सरासरी २३.४९ क्विंटल उत्पादन झाले आहे.मागील वर्षी जिल्हाभरात मावा व तुडतुडा रोगाने कहर केला होता. यावर्षी मात्र रोगाचे प्रमाण नगण्य होते. तसेच सुरुवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे वेळेत पार पडली. त्यामुळे धानाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.कापसाला फटकाजिरायती क्षेत्रात कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन होते. यावर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला नाही. याचा फटका कापूस पिकाला बसला आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला होता. त्यामुळे पिकाला अधिकची बोंडे येऊन कापूस पिकाचे उत्पादन वाढले होते. यावर्षी मात्र कापूस पिकाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. काही शेतकºयांचा तर खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे.पावसाच्या उसंतीने पुन्हा धान मळणीला सुरूवातरविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे धानाची मळणी थांबली होती. अनेक शेतकºयांनी धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकून धानाचे संरक्षण केले. पावसाने उसंत घेतल्यानंतरही दोन दिवस धानाची गंजी वाळण्यासाठी शेतकºयांनी वेळ दिला. त्यानंतर आता मात्र पुन्हा मळणीला सुरुवात झाली आहे. परंतु आठवडाभरापूर्वी जड धानाची बांधणी करून धानाची गंजी तयार करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे गंजीतील धान भिजले आहे. त्यामुळे या शेतकºयांच्या धानाला कमी दर मिळण्याची भीती अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती