शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गृह तालुका सोडून इतरत्र लढणाऱ्यांसमोर संकट

By admin | Updated: February 3, 2017 01:19 IST

जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात अनेक मतदार संघ अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती प्रवर्ग व महिलांसाठी राखीव झाल्याने

ग्रा. पं. पातळीवरच प्रचार वाढला : स्थानिक उमेदवाराला निवडून देण्यावर भर द्यागडचिरोली : जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात अनेक मतदार संघ अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती प्रवर्ग व महिलांसाठी राखीव झाल्याने या तालुक्यातील अनेक राजकीय नेते दुसऱ्या तालुक्यात जाऊन निवडणुका लढत आहेत. तसेच अहेरी उपविभागातही अनेक मातब्बर आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. मात्र यावर्षी मतदारांमध्ये स्थानिक उमेदवार असला पाहिजे, असा प्रचंड मोठा मतप्रवाह आपोआपच निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातीलच उमेदवार जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी ग्रामपंचायतपातळीपासून सुरू झाली आहे. याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्याही अनेक दिग्गज उमेदवारांना बसणार आहे. गडचिरोली जिल्हा हा विस्ताराने प्रचंड मोठा आहे. १२ तालुके असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६०० वर अधिक गावे आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा गावांचा मिळून एक जिल्हा परिषद मतदार संघ तयार करण्यात आला आहे. पेसा कायदा लागू झाल्याने अनेक क्षेत्र हे अनुसूचित जमाती भागात समाविष्ट झाले. कुरखेडा तालुक्यात विद्यमान ओबीसी राजकीय नेतृत्वाला यामुळेच हद्दपार व्हावे लागले. येथील काही उमेदवार लागूनच असलेल्या देसाईगंज तालुक्यात निवडणुकीच्या मैदानात आहे. तर गडचिरोली शहरात राहणारे काही उमेदवारही दुर्गम भागात तसेच गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात जाऊन निवडणुकीच्या मैदानात आहे. कुरखेडा तालुक्यातून गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिला उमेदवार गडचिरोलीलगतच्या मतदार संघात यंदा निवडणूक लढत आहे. हे बाहेरचे उमेदवार स्थानिक उमेदवारांवर राजकीय अन्याय करणारे असल्याने यांना हटवा, असा प्रचंड मोठा प्रवाह मतदारांमध्ये दिसून येत आहे. आपल्या गावातील माणूस निवडून आल्यास आपल्या समस्या योग्यरितीने समजू शकेल, अशी भावना मतदारांमध्ये आहे. प्रचंड श्रीमंत व पैसेवाले लोक पैसा वाटून निवडून जातील, त्यानंतर पुन्हा गावाकडे पाठ फिरविणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरखळा भागातील एका वृद्ध मतदाराने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक उमेदवारांनाच संधी देण्याची तयारी ग्रामस्थांनी चालविलेली आहे. यासाठी एक मोठे अभियान निवडणूक काळात हाती घेतले जाणार आहे. असा प्रचार व्यापक स्वरूपात झाल्यास गडचिरोली शहरात ऐशआरामात राहून केवळ निवडणुकीपुरतेच ग्रामीण भागात जाणाऱ्या दिग्गजांना मतदारराजा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)