शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:24 IST

विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे महाराजस्व अभियान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, नायब तहसीलदार सुधाकर बावणे, तनगुलवार, जि. प. सदस्य रमेश बारसागडे, विद्या आभारे, सभापती आनंद भांडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, रमेश अधिकारी, माणिकराव तुरे, गुंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. देवराव होळी म्हणाले, शासनाने ६ जून २०१८ ला शासन निर्णय काढला आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकºयांनी आपल्या वर्ग २ च्या जमिनी सहा महिन्याच्या आत वर्ग १ करून घ्यावे. त्याचबरोबर अतिक्रमणधारकांनी प्रॉपर्टी कार्ड भरून जमीन आपल्या नावे करावी. बंगाली बांधवांच्या जमिनीची मोजणी झाली असून त्यांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, ३५ हजार कोटी रूपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अजून जमा झाली नाही त्यांना लवकरच कर्जमाफी देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत, शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या हिताला राज्य व केंद्र शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.तालुका कृषी विभागाकडून चार लाभार्थ्यांना तुरीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी