शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

गडचिरोलीच्या विकासाकडे पंतप्रधानांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:37 IST

मागास असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील ११५ जिल्हे निवडले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील चार जिल्हे असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देलवकरच होणार जिल्ह्याचा कायापालट : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा विश्वास

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मागास असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील ११५ जिल्हे निवडले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील चार जिल्हे असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या विकासाकडे पंतप्रधान स्वत: लक्ष घालत आहेत. त्यामुळे येत्या काळात गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट झाला असेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी गांधी विचार आणि अहिंसा या पुस्तकातील उतारा वाचन कार्यक्रमापूर्वी आयोजित बिरसा मुंडा यांच्या वंशजांच्या सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करीत होते.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजारामा स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) हरी बालाजी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा, बुधराम मुुंडा, सुखराम मुंडा यांच्या मुली चंपा व जौनी मुंडा उपस्थित होत्या. यावेळी हंसराज अहीर यांच्या हस्ते मुंडा कुटुंबिय व कार्यक्रमाचे आयोजन करणाºयांचा सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना हंसराज अहीर म्हणाले, सीआरपीएफची गरज देशाच्या सीमेवर आहे. मात्र नक्षलवाद्यांमुळे ही फौज गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात वापरावी लागत आहे.यापूर्वी आदिवासींवर अन्याय होत असल्याने नक्षलवादाची गरज होती. मात्र स्वातंत्र्यानंतर आता दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी शासन सदैव तत्पर आहे. त्यामुळे आता नक्षलवादाची गरज उरलेली नाही. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे मार्गदर्शन केले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर