शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

गडचिरोलीच्या विकासाकडे पंतप्रधानांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:37 IST

मागास असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील ११५ जिल्हे निवडले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील चार जिल्हे असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देलवकरच होणार जिल्ह्याचा कायापालट : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा विश्वास

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मागास असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील ११५ जिल्हे निवडले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील चार जिल्हे असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या विकासाकडे पंतप्रधान स्वत: लक्ष घालत आहेत. त्यामुळे येत्या काळात गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट झाला असेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी गांधी विचार आणि अहिंसा या पुस्तकातील उतारा वाचन कार्यक्रमापूर्वी आयोजित बिरसा मुंडा यांच्या वंशजांच्या सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करीत होते.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजारामा स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) हरी बालाजी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा, बुधराम मुुंडा, सुखराम मुंडा यांच्या मुली चंपा व जौनी मुंडा उपस्थित होत्या. यावेळी हंसराज अहीर यांच्या हस्ते मुंडा कुटुंबिय व कार्यक्रमाचे आयोजन करणाºयांचा सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना हंसराज अहीर म्हणाले, सीआरपीएफची गरज देशाच्या सीमेवर आहे. मात्र नक्षलवाद्यांमुळे ही फौज गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात वापरावी लागत आहे.यापूर्वी आदिवासींवर अन्याय होत असल्याने नक्षलवादाची गरज होती. मात्र स्वातंत्र्यानंतर आता दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी शासन सदैव तत्पर आहे. त्यामुळे आता नक्षलवादाची गरज उरलेली नाही. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे मार्गदर्शन केले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर