शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पंधरवड्यापासून वीज समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:54 IST

दुर्गम व अतिदुर्गम तथा संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यापासून वीज समस्या आहे. दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवीज पुरवठा वारंवार खंडित : धानोरा शहर व तालुक्यातील नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : दुर्गम व अतिदुर्गम तथा संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यापासून वीज समस्या आहे. दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.धानोरा येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. येथे सिंगल फेज लाईन असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुरूस्तीशिवाय पर्याय राहत नाही. आधीच जंगलव्याप्त तालुका असल्याने विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. जराशी हवा अथवा वादळ आल्यास विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेकदा झाडाच्या फांद्या तारांवर कोसळतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. मागील पंधरवड्यापासून शहरासह तालुक्यात वीज समस्या वाढली आहे. दिवसभरात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. १४ व १५ जून रोजी जंगलातील वठलेले झाड अज्ञात इसमांनी बुडापासून जाळल्याने संपूर्ण झाड विद्युत तारांवर कोसळले. त्यामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या दिवशी वीज रात्री ९ वाजता खंडित झाल्यानंतर पहाटे ४ वाजता दुरूस्तीनंतर सुरू झाली. १९ जून रोजी झाडाच्या फांद्या छाटणे व दुरूस्तीकरिता सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. तसेच याच दरम्यान दिवस व रात्रीच्या सुमारास जवळपास ८ ते १० वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्युतवर चालणाऱ्या उपकरणांवर परिणाम झाला. पंधरवड्यापासून ही समस्या वाढली असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.अनेक कामांवर परिणामकाही दिवसांपूर्वी बारावी व दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कामाकरिता इंटरनेट कॅफेवर अथवा अन्य ठिकाणी कामाकरिता जावे लागते. तसेच खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच बँकेचे व्यवहार करावे लागतात. त्यामुळे वीज पुरवठा नियमित असणे आवश्यक आहे. परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी व नागरिकही त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :electricityवीज