शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. विद्युत कार्यालयाकडून सकाळीच याबद्दल नगर पंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देझाड कोसळल्याचा परिणाम : उशिरा पोहोचले अहेरी नगर पंचायतीचे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील नवीन तहसील कार्यालय मार्गावरील वीज वितरण कंपनी कार्यालय परिसरात मुसळधार पावसाने मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड कोसळले. त्यामुळे अहेरी शहराचा वीजपुरवठा साडे चार तास खंडित होता व रस्त्यावरील वाहतूकसुद्धा बंद होती. परंतु रस्त्यावर कोसळलेले झाड उचलण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी दोन तास उशिरा पोहोचले.आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. विद्युत कार्यालयाकडून सकाळीच याबद्दल नगर पंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र तब्बल साडे चार तास कोणतेही कर्मचारी झाड हटवायला आले नाही. त्यामुळे अहेरीसह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा बंद होता आणि तहसील कार्यालय मार्गावरील वाहतूक बंद होती. यानंतर महावितरण कंपनी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित शेंडे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन काही ठिकाणी फांद्या तोडून विद्युत पुरवठा सुरू केला तर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता येऊन झाड तोडण्याचे काम सुरू केले. या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.दुर्गम भागात गंभीर स्थितीपावसाळ्याचे दिवस असल्याने अहेरी तालुक्यासह उपविभागातील अनेक गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होता. या भागात वेळीच विद्युत कर्मचारी पोहोचत नसल्याने दोन ते तीन दिवस नागरिकांना अंधारातच रात्री काढावी लागते. विशेष म्हणजे, अहेरी उपविभागातील विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे जरासा वादळवारा सुटल्यास वीज पुरवठा खंडित होते. वादळी पावसामुळे विद्युत लाईनवर झाडे कोसळल्यास बिघाड शोधताना विद्युत कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागतात. अनेकदा दोन ते तीन दिवस बिघाड सापडत नाही. त्यामुळे दुर्गम भागात अनियमित वीज पुरवठ्याची गंभीर स्थिती पावसाळ्याच्या दिवसात पाहावयास मिळते. त्यामुळे विद्युत लाईन योग्यप्रकारे रस्त्याजवळून नेणे आवश्यक आहे.

टॅग्स :electricityवीजRainपाऊस