शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

धानोरातील वीज आठ तास गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

ठळक मुद्देउकाड्याने नागरिक त्रस्त : महावितरणचा नियोजनशून्य कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गेल्या सात-आठ दिवसांपासून उष्णतेचा पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. अशा स्थितीत नागरिक कुलर व पंख्याशिवाय स्लॅबच्या घरात राहू शकत नाही. मात्र नेमक्या अशाच वेळी २७ मे रोजी बुधवारला धानोरा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा तब्बल ८ तास खंडित होता. परिणामी उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले. या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु येथील वीज कर्मचाऱ्यांनी एक तास उशिरा म्हणजे सकाळी ९ वाजतापासून झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामास सुरूवात केली. हे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होते. परिणामी शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद होता. काम आटोपल्यावर ५ वाजून १० मिनीटांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. नागरिकांनी तब्बल ८ तास ४५ अंश सेल्सिअस तापमानात कुलर व पंख्याविना घालविले. परिणामी वृद्ध नागरिक व लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सध्या उष्णतामान वाढल्याने नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे.बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना दिलीच नाहीयापूर्वी कोणत्याही ठिकाणची वीज दुरूस्तीची कामे किंवा झाडाच्या फांद्या तोडण्यासाठीच्या कामादरम्यान किती तास व कोणत्या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे, याबाबतची पूर्वसूचना प्रसार माध्यमातून दिली जात होती. मात्र महावितरणच्या वतीने अशी कुठलीही पूर्वसूचना धानोरा तालुक्यातील नागरिकांना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांना देण्यात आली नाही. त्यामुळे धानोरावासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. डिस्चार्ज झाल्याने अनेकांचे मोबाईलसुद्धा बंद पडले होते.

टॅग्स :electricityवीज