शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

धानोरातील वीज आठ तास गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

ठळक मुद्देउकाड्याने नागरिक त्रस्त : महावितरणचा नियोजनशून्य कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गेल्या सात-आठ दिवसांपासून उष्णतेचा पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. अशा स्थितीत नागरिक कुलर व पंख्याशिवाय स्लॅबच्या घरात राहू शकत नाही. मात्र नेमक्या अशाच वेळी २७ मे रोजी बुधवारला धानोरा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा तब्बल ८ तास खंडित होता. परिणामी उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले. या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु येथील वीज कर्मचाऱ्यांनी एक तास उशिरा म्हणजे सकाळी ९ वाजतापासून झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामास सुरूवात केली. हे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होते. परिणामी शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद होता. काम आटोपल्यावर ५ वाजून १० मिनीटांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. नागरिकांनी तब्बल ८ तास ४५ अंश सेल्सिअस तापमानात कुलर व पंख्याविना घालविले. परिणामी वृद्ध नागरिक व लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सध्या उष्णतामान वाढल्याने नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे.बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना दिलीच नाहीयापूर्वी कोणत्याही ठिकाणची वीज दुरूस्तीची कामे किंवा झाडाच्या फांद्या तोडण्यासाठीच्या कामादरम्यान किती तास व कोणत्या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे, याबाबतची पूर्वसूचना प्रसार माध्यमातून दिली जात होती. मात्र महावितरणच्या वतीने अशी कुठलीही पूर्वसूचना धानोरा तालुक्यातील नागरिकांना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांना देण्यात आली नाही. त्यामुळे धानोरावासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. डिस्चार्ज झाल्याने अनेकांचे मोबाईलसुद्धा बंद पडले होते.

टॅग्स :electricityवीज