शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

पॉस मशीन ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:56 IST

केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालणारी यंत्रणा पोहोचवून त्यावरच सर्व कामे करणे सक्तीचे केले.

ठळक मुद्देवडधा परिसरातील ग्राहक त्रस्त : ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालणारी यंत्रणा पोहोचवून त्यावरच सर्व कामे करणे सक्तीचे केले. यापासून वितरण प्रणालीही सुटली नाही. परंतु ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानांमध्ये लावण्यात आलेल्या पॉस मशीन इंटरनेट कनेक्टिव्हिटी पकडत नसल्याने अनेक ग्राहकांना स्वस्त धान्य वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी दिवाळीच्या सणातही अनेक ग्राहक स्वस्त धान्यापासून वंचित राहिले. पॉस मशीन सध्या ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.स्वस्त धान्याची उचल करण्याकरिता संबंधित कुटुंबातील एका सदस्याचे फिंगर प्रिंट पॉस मशीवर लागणे गरजेचे आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी मशीन पकडत असेल तरच फिंगर प्रिंट आॅनलाईन स्वीकारले जाते. परंतु वडधा परिसरातील देलोडा बूजसह परिसरातील गावांमध्ये मागील पंधरवड्यापासून इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याने या या भागातील ग्राहकांना स्वस्त धान्य वेळेवर मिळणे कठिण झाले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकाने आॅनलाईन झाली आहेत. परंतु शासन ग्रामीण भागात योग्य इंटरनेट सुविधा पोहोचविण्यास असफल ठरले आहे. धान्यासाठी लाभार्थी कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक वितरण प्रणालीशी करण्यात आले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य खरेदी करताना दुकानातील पॉस मशीनवर कुटुंबातील एका सदस्याचे फिंगर प्रिंट घेणे गरजेचे असते. फिंगर प्रिंट व्हेरिफाय झाल्यानंतरच राशन दिल्या जाते. परंतु अनेक लाभार्थ्यांचे फिंगर प्रिंट मशीनवर उमटत नाही तर अनेकदा कनेक्टिव्हिटीअभावी बराच वेळ लागतो. देलोडा बूज येथे ८ आॅक्टोबरपासून स्वस्त धान्य दुकानात माल प्राप्त झाला. परंतु कनेक्टिव्हिटीअभावी गरजू लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.लाभार्थी दिवसभर ताटकळतातवडधा परिसरात इंटरनेटची समस्या असल्याने लाभार्थ्यांना पॉस मशीन डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे, पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा ठसा उमटेल व फिंगर व्हेरिफाय होईल तरच राशन दिले जाते. अन्यथा दिवसभर लाभार्थ्याला स्वस्त धान्य दुकानात ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे या भागातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.