शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मूल्यवर्धनातून सकारात्मक बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने आपल्या सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्टÑात नाव मिळविले आहे. दुष्काळ निवारण, शैक्षणिक ...

ठळक मुद्देजि.प.सीईओंचे प्रतिपादन । जिल्हा मेळाव्यातून जाणली फलनिष्पत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने आपल्या सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्टÑात नाव मिळविले आहे. दुष्काळ निवारण, शैक्षणिक जनजागृती व इतर कामे प्रभावीपणे केली आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमातून जि.प. शाळा व त्यातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत, असे प्रतिपादन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्टÑ पुणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प. हायस्कूललगतच्या सभागृहात शनिवारी मूल्यवर्धन जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे प्रमुख शांतीलाल मुथ्था, गडचिरोली जिल्हाध्यक्ष निरज बोथरा, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, डायटचे अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, वैशाली एगलोपवार, महेंद्र मंडलेचा आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी शिक्षणाधिकारी मुनघाटे, पाटील यांनीही जि.प. शाळांमध्ये सुरू असलेल्या मूल्यर्वधन उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्याला जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शांतीलाल मुथ्था, संचालन प्रज्ञा साखरे यांनी तर आभार वैशाली एगलोपवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजन बोरकर, डायटचे डॉ. विजय रामटेके, प्रभाकर साखरे, कुणाल कोवे, प्रदीप पाटील यांनी सहकार्य केले.विद्यार्थ्यांमध्येमूल्य व कौशल्य विकासावर भर-मुथ्थागडचिरोली जिल्ह्यात जि.प.च्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मूल्यवर्धन उपक्रम सातत्याने सुरू आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, कौशल्य व क्षमता रूजवून भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन शांतीलाल मुथ्था यांनी यावेळी केले. दरम्यान त्यांनी याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षकांशी संवाद साधून सदर मूल्यवर्धन उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद, घडून येणारे बदल आदी बाबतची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा