शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नागरिक व जवानांच्या श्रमदानातून पूल दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:36 IST

एटापल्ली तालुक्यातील कसनसूर ते रेगडी मार्गावरील एटावाही गावाजवळील पूल यावर्षी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेला होता.

ठळक मुद्देएटावाही नाल्यावरील पूल : २० गावातील नागरिकांसाठी सोयीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर ते रेगडी मार्गावरील एटावाही गावाजवळील पूल यावर्षी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेला होता. त्यामुळे चामोर्शी-घोट-कसनसूर व पुढे छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. नागरिक व पोलीस जवानांनी श्रमदान करीत सदर पुलाची दुरूस्ती केली.कोटमी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भरत नागरे, पोलीस उपनिरिक्षक गिरीधर पेंदोर, प्रशांत भागवत, प्रदीप ठुबे यांनी पुढाकार घेतला. एटावाही, कोटमी, कोंडावाही गावातील नागरिकांना श्रमदानासाठी प्रवृत्त केले. नागरिकांबरोबरच पोलीस जवानांनी सुध्दा श्रमदान केले. जवळपास चार फूट उंचीचे असलेले पाईप व्यवस्थित लावले. त्यावर सिमेंट व मातीचा भराव देत पूल तयार केले. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत काम केल्याने अवघ्या दोन दिवसात पूल रहदारीसाठी तयार झाला.विशेष म्हणजे, पूल तुटल्यामुळे कसनसूर परिसरातील जवळपास २० गावातील नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसाळ्यात या नाल्यावर पाच फुटापेक्षा अधिक पाणी राहत असल्याने वाहतूक होणे अशक्य होते. परिणामी या परिसरातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व इतर सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होणार होती. पोलिसांनी पुढाकार घेत मार्गाची दुरूस्ती केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस