शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयाला हेलपाटा मारूनही पांदण रस्ता अपूर्ण

By admin | Updated: May 12, 2016 01:37 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते.

चार वर्षे उलटली : चाकलपेठच्या शेतकऱ्यांची अडचणचामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते. या कामाची २४ लाख ६५ हजार ७२१ रूपये अंदाजपत्रकीय किमत आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सदर कामाची चौकशी करून काम पूर्ण करावे, अशी मागणी चामोर्शीतील प्रभाग क्र. १७ चे नगरसेवक अविनाश चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चाकलपेठ ग्रा. पं. अंतर्गत २०११-१२ या वर्षात चालकपेठ ते वाघदरा या २ हजार ७०० मीटर पांदण रस्त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुरी मिळाली. त्यानंतर लाखो रूपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु सदर काम अर्धवटच झाले. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर काम पूर्ण करण्यात आले नाही.६ मे २०१४ व १७ जून २०१४ मध्ये तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, शकुंतला केशरी चौधरी यांच्या शेतापर्यंत मातीकाम झालेले आहे. त्यात ६०० मीटरचा काही भाग काम करणे बाकी आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाही. १७ मे २०१४ ला मंडळ अधिकारी येणापूर यांना चौकशी अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदारांचे पत्र मिळूनही कामाची चौकशी झाली नाही. ४ डिसेंबर २०१५ ला तहसीलदारांना पुन्हा अर्ज सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना नायब तहसीलदार येणापूर सर्कल यांना ८ डिसेंबर रोजी कार्यवाही करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र दिले. तरीही चौकशी झाली नाही. २ मे २०१६ ला तहसीलदारांची भेटी घेऊन काम करण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत वारंवार तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, मे २०१६ अखेरपर्यंत काम तत्काळ पूर्ण करावे, सदर काम पूर्ण न केल्यास चामोर्शीचे तहसीलदार तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा नगरसेवक अविनाश चौधरी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)