शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

तहसील कार्यालयाला हेलपाटा मारूनही पांदण रस्ता अपूर्ण

By admin | Updated: May 12, 2016 01:37 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते.

चार वर्षे उलटली : चाकलपेठच्या शेतकऱ्यांची अडचणचामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते. या कामाची २४ लाख ६५ हजार ७२१ रूपये अंदाजपत्रकीय किमत आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सदर कामाची चौकशी करून काम पूर्ण करावे, अशी मागणी चामोर्शीतील प्रभाग क्र. १७ चे नगरसेवक अविनाश चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चाकलपेठ ग्रा. पं. अंतर्गत २०११-१२ या वर्षात चालकपेठ ते वाघदरा या २ हजार ७०० मीटर पांदण रस्त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुरी मिळाली. त्यानंतर लाखो रूपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु सदर काम अर्धवटच झाले. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर काम पूर्ण करण्यात आले नाही.६ मे २०१४ व १७ जून २०१४ मध्ये तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, शकुंतला केशरी चौधरी यांच्या शेतापर्यंत मातीकाम झालेले आहे. त्यात ६०० मीटरचा काही भाग काम करणे बाकी आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाही. १७ मे २०१४ ला मंडळ अधिकारी येणापूर यांना चौकशी अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदारांचे पत्र मिळूनही कामाची चौकशी झाली नाही. ४ डिसेंबर २०१५ ला तहसीलदारांना पुन्हा अर्ज सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना नायब तहसीलदार येणापूर सर्कल यांना ८ डिसेंबर रोजी कार्यवाही करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र दिले. तरीही चौकशी झाली नाही. २ मे २०१६ ला तहसीलदारांची भेटी घेऊन काम करण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत वारंवार तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, मे २०१६ अखेरपर्यंत काम तत्काळ पूर्ण करावे, सदर काम पूर्ण न केल्यास चामोर्शीचे तहसीलदार तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा नगरसेवक अविनाश चौधरी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)