शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

रांगी परिसरातील तलाव कोरडे

By admin | Updated: December 30, 2015 02:04 IST

धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी टंचाईची चाहूल : महसूल व वन विभागाने उपाययोजना करण्याची गरजरांगी : धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस पडला. त्यामुळे तलाव पूर्णपणे भरले नाही. तलावामध्ये साचलेले पाणी धान पिकासाठी वापरण्यात आले. त्यामुळे तलाव नोव्हेंबर महिन्यातच कोरड पडण्यास सुरूवात झाले. उर्वरित पाणी रबी हंगामासाठी वापरण्यात आल्याने तलाव आता पूर्णपणे कोरडे पडले आहेत. डिसेंबर महिन्यात ही स्थिती आहे. जंगलातीलही पाणवटे आटण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी फेब्रुवारी महिन्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रांगी परिसरातील ९० टक्के नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे जनावरे आहेत. जनावरांना चारण्यासाठी जंगलामध्ये नेले जाते. मात्र जंगलातीलही पाणवटे आटल्याने पाळीव जनावरांना घरी पाणी उपलब्ध करून द्यावे लागत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून थोड्याफार प्रमाणात असलेल्या जलसाठ्याचा उपसा केला जाऊ नये यासाठी उपाय योजना करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)