शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रांगी परिसरातील तलाव कोरडे

By admin | Updated: December 30, 2015 02:04 IST

धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी टंचाईची चाहूल : महसूल व वन विभागाने उपाययोजना करण्याची गरजरांगी : धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस पडला. त्यामुळे तलाव पूर्णपणे भरले नाही. तलावामध्ये साचलेले पाणी धान पिकासाठी वापरण्यात आले. त्यामुळे तलाव नोव्हेंबर महिन्यातच कोरड पडण्यास सुरूवात झाले. उर्वरित पाणी रबी हंगामासाठी वापरण्यात आल्याने तलाव आता पूर्णपणे कोरडे पडले आहेत. डिसेंबर महिन्यात ही स्थिती आहे. जंगलातीलही पाणवटे आटण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी फेब्रुवारी महिन्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रांगी परिसरातील ९० टक्के नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे जनावरे आहेत. जनावरांना चारण्यासाठी जंगलामध्ये नेले जाते. मात्र जंगलातीलही पाणवटे आटल्याने पाळीव जनावरांना घरी पाणी उपलब्ध करून द्यावे लागत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून थोड्याफार प्रमाणात असलेल्या जलसाठ्याचा उपसा केला जाऊ नये यासाठी उपाय योजना करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)