शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांनी विकासासाठी एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन : देसाईगंजमध्ये अनेक संघटना व संस्थांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : राज्यात आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षानुवर्ष पुरेल, अशी एवढी खनिज संपत्ती आहे. लोहखनिजावर आधारीत सुरजागड प्रकल्प सुरू झाला तर जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील. जिल्ह्यातील बेकारी पूर्णपणे दूर होईल. मात्र त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी एकजूट होणे काळाची गरज आहे, अशी भावना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.देसाईगंज जवळील कुरूड येथे मॉ शारदा फुड प्रॉडक्ट राईस इंडस्ट्रिजच्या प्रांगणात आयोजित उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीपसाई जग्यासी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, डॉ. प्रमोद साळवे, सुधीर भातकुलकर, अ‍ॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीष मोटवानी, सुधीर रामानी, राम कांबळे, सतिश विधाते, डॉ. अविनाश शिवणकर, त्रिचंद दासवानी, निलोफर शेख, नलिनी माने आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना विदर्भाच्या प्रश्नांची जाणीव असून हे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत. येत्या पाच वर्षात विदर्भाचा विकास नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून पाठपुरावा करण्याची गरज आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ ही बाब राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. उद्योग निर्मितीसाठी दळणवळणाची साधने व मार्ग महत्त्वाचे आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न रखडला आहे. रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वप्रथम रोजगाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पटोले यांनी केले.अनेक जणांकडून निवेदन सादरसत्कार समारंभाला जाण्यापूर्वी नाना पटोले यांनी देसाईगंज येथील गुरूदेव सेवाश्रमाला भेट दिली. यावेळी गुरूदेव प्रेमींनी सेवाश्रमाच्या विकासासाठी निधी द्यावा, असे निवेदन दिले. निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पटोले यांनी दिले. त्यानंतर देसाईगंज येथील गुरूद्वाराला भेट देऊन गुरूग्रंथ साहेबाचे दर्शन घेतले. शिख समाजातील नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे देसाईगंज येथील पत्रकारांनी निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, तसेच पत्रकारांना पेन्शन लागू करावी, असे निवेदन दिले. कंत्राटी तत्वावरकाम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित करण्याबाबतचे निवेदन दिले. पटोले यांनी देसाईगंज महोत्सवालाही भेट दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले