शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

राजकीय नेत्यांनी विकासासाठी एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन : देसाईगंजमध्ये अनेक संघटना व संस्थांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : राज्यात आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षानुवर्ष पुरेल, अशी एवढी खनिज संपत्ती आहे. लोहखनिजावर आधारीत सुरजागड प्रकल्प सुरू झाला तर जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील. जिल्ह्यातील बेकारी पूर्णपणे दूर होईल. मात्र त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी एकजूट होणे काळाची गरज आहे, अशी भावना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.देसाईगंज जवळील कुरूड येथे मॉ शारदा फुड प्रॉडक्ट राईस इंडस्ट्रिजच्या प्रांगणात आयोजित उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीपसाई जग्यासी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, डॉ. प्रमोद साळवे, सुधीर भातकुलकर, अ‍ॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीष मोटवानी, सुधीर रामानी, राम कांबळे, सतिश विधाते, डॉ. अविनाश शिवणकर, त्रिचंद दासवानी, निलोफर शेख, नलिनी माने आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना विदर्भाच्या प्रश्नांची जाणीव असून हे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत. येत्या पाच वर्षात विदर्भाचा विकास नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून पाठपुरावा करण्याची गरज आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ ही बाब राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. उद्योग निर्मितीसाठी दळणवळणाची साधने व मार्ग महत्त्वाचे आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न रखडला आहे. रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वप्रथम रोजगाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पटोले यांनी केले.अनेक जणांकडून निवेदन सादरसत्कार समारंभाला जाण्यापूर्वी नाना पटोले यांनी देसाईगंज येथील गुरूदेव सेवाश्रमाला भेट दिली. यावेळी गुरूदेव प्रेमींनी सेवाश्रमाच्या विकासासाठी निधी द्यावा, असे निवेदन दिले. निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पटोले यांनी दिले. त्यानंतर देसाईगंज येथील गुरूद्वाराला भेट देऊन गुरूग्रंथ साहेबाचे दर्शन घेतले. शिख समाजातील नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे देसाईगंज येथील पत्रकारांनी निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, तसेच पत्रकारांना पेन्शन लागू करावी, असे निवेदन दिले. कंत्राटी तत्वावरकाम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित करण्याबाबतचे निवेदन दिले. पटोले यांनी देसाईगंज महोत्सवालाही भेट दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले