शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

मतदानाच्या तोंडावर झालेल्या निर्णयाने राजकीय गोटात खळबळ

By admin | Updated: April 25, 2015 01:44 IST

गडचिरोली जिल्ह्यात दहा नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दहा नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. याबाबत तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची आग्रही भूमिका राहिली होती. या निर्णयावर आता भाजप प्रणीत सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्यासाठी साधलेल्या मुहूर्तावरून जिल्ह्याच्या राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतीच्या ठिकाणी सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया थांबवून सरकारने हा निर्णय घेतला. यावरून काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी सरकार व प्रशासनाचा समन्वय नसल्याची टीका केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, अहेरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी निवडणुकीचे मतदान तोंडावर असताना रात्री उशिरा निर्णयाची प्रत पाठविण्यात आली. नगर पंचायती करायच्याच होत्या तर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य सरकारने राबविली कशाला, असा प्रश्न रिंगणातील उमेदवारांसह विरोधी पक्षानेही उपस्थित केला आहे. नगर पंचायत करण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत होते. मात्र भाजप सरकारने निवडणूक प्रक्रिया थांबवून हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी व नेत्यांनी खर्चही केला होता. सरकारने ग्राम पंचायत निवडणुका घेण्यापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर प्रशासनाची निवडणुकीसाठीची झालेली कसरत वाचली असती व जे उमेदवार रिंगणात उतरले त्यांचाही पैसा वाचला असता, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील झोपलेल्या लोकप्रतिनिधींनी ऐन वेळेवर मंत्र्यांकडे धाव घेऊन घाईघाईने हा निर्णय करवून आणला. यामागे सत्ताधारी भाजपचा राजकीय स्वार्थही ठळकपणे दिसून येणारा आहे. जिल्ह्यात अहेरीसह अनेक ग्राम पंचायती गेल्या अनेक वर्षांपासून त्याचत्याच सत्ताधाऱ्याच्या हाती आहे. हे सत्ताधारी कुठलाही विकास करून त्या गावाचे चित्र बदलू शकले नाही व या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दणका बसण्याचे चिन्हे दिसू लागताच नगर पंचायती करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला, अशी टीका आता भाजपवर होऊ लागली आहे. यासाठी अहेरी ग्राम पंचायतीचे उदाहरणही विरोधी पक्ष देऊ लागले आहे. या निर्णयातून सरकारची लेटलतीफशाही दिसून आली असून नेतृत्त्व असक्षम असले की, असे घाईगडबडीने निर्णय घेतले जातात, अशी बोलकी प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून देण्यात आली आहे. एकूणच समन्वयाचा अभाव सरकारीपातळीवर राहिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली.