शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या तोंडावर झालेल्या निर्णयाने राजकीय गोटात खळबळ

By admin | Updated: April 25, 2015 01:44 IST

गडचिरोली जिल्ह्यात दहा नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दहा नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. याबाबत तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची आग्रही भूमिका राहिली होती. या निर्णयावर आता भाजप प्रणीत सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्यासाठी साधलेल्या मुहूर्तावरून जिल्ह्याच्या राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतीच्या ठिकाणी सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया थांबवून सरकारने हा निर्णय घेतला. यावरून काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी सरकार व प्रशासनाचा समन्वय नसल्याची टीका केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, अहेरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी निवडणुकीचे मतदान तोंडावर असताना रात्री उशिरा निर्णयाची प्रत पाठविण्यात आली. नगर पंचायती करायच्याच होत्या तर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य सरकारने राबविली कशाला, असा प्रश्न रिंगणातील उमेदवारांसह विरोधी पक्षानेही उपस्थित केला आहे. नगर पंचायत करण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत होते. मात्र भाजप सरकारने निवडणूक प्रक्रिया थांबवून हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी व नेत्यांनी खर्चही केला होता. सरकारने ग्राम पंचायत निवडणुका घेण्यापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर प्रशासनाची निवडणुकीसाठीची झालेली कसरत वाचली असती व जे उमेदवार रिंगणात उतरले त्यांचाही पैसा वाचला असता, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील झोपलेल्या लोकप्रतिनिधींनी ऐन वेळेवर मंत्र्यांकडे धाव घेऊन घाईघाईने हा निर्णय करवून आणला. यामागे सत्ताधारी भाजपचा राजकीय स्वार्थही ठळकपणे दिसून येणारा आहे. जिल्ह्यात अहेरीसह अनेक ग्राम पंचायती गेल्या अनेक वर्षांपासून त्याचत्याच सत्ताधाऱ्याच्या हाती आहे. हे सत्ताधारी कुठलाही विकास करून त्या गावाचे चित्र बदलू शकले नाही व या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दणका बसण्याचे चिन्हे दिसू लागताच नगर पंचायती करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला, अशी टीका आता भाजपवर होऊ लागली आहे. यासाठी अहेरी ग्राम पंचायतीचे उदाहरणही विरोधी पक्ष देऊ लागले आहे. या निर्णयातून सरकारची लेटलतीफशाही दिसून आली असून नेतृत्त्व असक्षम असले की, असे घाईगडबडीने निर्णय घेतले जातात, अशी बोलकी प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून देण्यात आली आहे. एकूणच समन्वयाचा अभाव सरकारीपातळीवर राहिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली.