लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपुष्टात आले. त्यानंतर पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. चामोर्शी तालुक्याच्या हरणघाट नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त पुन्हा कडक करण्यात आला.लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे आवागमन बंद करण्यात आले आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या निर्देशानुसार चामोर्शी-मूल मार्गावरील वैैनगंगा नदीवरील हरणघाटाजवळील नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करणार नाही, यासाठी पोलीस सजग आहेत. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांचा नागरिकांकडून दुरूपयोग होऊ नये, यासाठीही पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. येथून आवागमन करणाऱ्या प्रत्येक वाहनावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या मार्गाने अनावश्यक फिरणाऱ्यांचेही प्रमाण झपाट्याने घटले आहे. येथील नाक्यावर भेंडाळा बिट जमादार राजकुमार चिंचेकर, वाहतूक हवालदार संजय चक्कावार, पोलीस शिपाई राहूल पारेल्लीवार व रामसिंग जाधव आदी कर्तव्य पार पाडत आहेत.
पोलीस बंदोबस्त कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे आवागमन बंद करण्यात आले आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या निर्देशानुसार चामोर्शी-मूल मार्गावरील वैैनगंगा नदीवरील हरणघाटाजवळील नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करणार नाही, यासाठी पोलीस सजग आहेत.
पोलीस बंदोबस्त कडक
ठळक मुद्देसीमावर्ती भाग : लॉकडाऊन वाढविल्याने यंत्रणा पुन्हा सजग