शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

आमच्या बदल्यांची फाईल पुढे सरकेल का? नक्षलग्रस्त भागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिसांचे मूक रूदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 14:28 IST

अलीकडे शासनाला त्या निर्णयाचा विसर पडल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कौटुंबिक ताणतणावाला तोंड द्यावे लागत आहे.

गडचिरोली : राज्यात नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात अडीच वर्षे सेवा दिली की ऐच्छिक ठिकाणी बदली देण्याचा शासननिर्णय अनेक वर्षांपूर्वी राज्य सरकारने लागू केला आहे. नक्षलग्रस्त भागात सेवा देण्यासाठी कोणीही इच्छुक असावे हा त्यामागील हेतू होता. मात्र, अलीकडे शासनाला त्या निर्णयाचा विसर पडल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कौटुंबिक ताणतणावाला तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या काही महिन्यात राजकीय घडामोडींनी राज्य ढवळून निघाले. नवीन सरकार सत्तारूढ झाले. अनेक दिवसांपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने सर्वच विभागांचा कारभार ठप्प झाला होता, पण आता एकदाचे मंत्री मिळाले. खात्यांचेही वाटप झाले. किमान आतातरी गेल्या ६ महिन्यांपासून रखडलेल्या बदलीच्या प्रक्रियेची फाईल पुढे सरकेल का? असा सवाल तमाम बदलीपात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात उठत आहे.

दीडशेवर अधिकाऱ्यांच्या कार्यकाळ पूर्ण

शासननियमांनुसार पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा गडचिरोली किंवा गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अडीच वर्षांचा कार्यकाळ झाल्यानंतर प्रशासकीय बदली केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात असे ७ पोलीस निरीक्षक, २० पेक्षा जास्त सहायक पोलीस निरीक्षक आणि ९० पेक्षा जास्त उपनिरीक्षक आहेत. याशिवाय गोंदिया जिल्ह्यात ८ पोलीस निरीक्षक, २०ते २५ सहायक निरीक्षक आणि २० उपनिरीक्षक बदलीस पात्र आहेत.

सुख-दु:खात सहभागी होऊ शकत नाही

दिवंगत आर. आर. पाटील गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा नियम कटाक्षाने पाळला जात होता पण नंतरच्या काळात यात अनियमितता वाढत गेली. गेल्या ६ महिन्यापासून बदलीचे वेध लागलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक जणांचा गृह जिल्हा ७०० ते ८०० किलोमीटरवर आहे. त्यांच्या नातेवाईकांकडील सुख-दु:खाच्या कार्यक्रमात ते सहभागी होऊ शकत नसल्याचे शल्य त्यांना भेडसावत आहे. त्यामुळे ते मोठ्या तणावातून जात आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीGovernmentसरकार