शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 20:43 IST

मात्र ऐच्छिक ठिकाण तर दूर, कुठेही द्या, पण बदली करा, असे ‘मूक आर्जव’ करण्याची वेळ या भागातील पोलीस अधिका-यांवर आली आहे.

गडचिरोली : राज्यात पोलीस विभागासाठी सर्वाधिक धोकादायक क्षेत्र म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील सेवेकडे पाहिले जाते. कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीसाठी सदैव तत्पर राहाव्या लागणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा हा खडतर काळ पूर्ण केल्यानंतर ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्याची तरतूद शासनाने केली आहे. मात्र ऐच्छिक ठिकाण तर दूर, कुठेही द्या, पण बदली करा, असे ‘मूक आर्जव’ करण्याची वेळ या भागातील पोलीस अधिका-यांवर आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुके वगळता इतर ८ तालुके नक्षल कारवायांसाठी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील आहेत. नक्षलविरोधी अभियानासाठी नव्या दमाचे तरुण अधिकारी हवेत म्हणून नवप्रशिक्षित पोलीस उपनिरीक्षकांची संपूर्ण तुकडीच दर दोन ते अडीच वर्षांनी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात पाठविली जाते. याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक, निरीक्षक, राज्य पोलीस सेवेतील उपअधीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील बहुतांश अधिका-यांना सुरुवातीला याच जिल्ह्यात सेवा द्यावी लागते.सध्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील अडीच वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झालेले १४९ पोलीस उपनिरीक्षक, ३१ सहायक पोलीस निरीक्षक आणि काही निरीक्षक व उपअधीक्षक बदलीची प्रतीक्षा करत आहेत. मात्र सुरुवातीला कोरोना काळामुळे त्यांची बदल्यांची फाईल थांबवण्यात आली. आता इतर विभागांसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या होत आहेत. मात्र कनिष्ठ अधिका-यांना ताटकळत ठेवण्यात आल्याने त्यांच्यासह राज्याच्या विविध भागात राहणा-या त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती विचलित होत आहे.>बदल्यांसाठी ‘तारीख पे तारीख’अनेक अधिका-यांचा कार्यकाळ मे महिन्यातच पूर्ण झाला. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत बदल्या होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ५ ऑगस्ट, १० ऑगस्ट, ५ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि आता १५ ऑक्टोबरला बदल्यांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. बदल्या खरंच करायच्या असतील तर लवकर कराव्यात, नाहीतर यावर्षी होणारच नाही, असे स्पष्टपणे सांगावे, म्हणजे आम्ही व आमचे कुटुंबीय येथे राहण्याची मानसिकता बनवू, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका अधिका-याने व्यक्त केली.