शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पोलीस दलाने मिळवून दिला १४० तरुणांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. 

ठळक मुद्देहैदराबादमध्ये देणार सेवा, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्या तरुणांनी कधी जिल्ह्याच्या बाहेरची दुनिया पाहिली नाही त्या दुर्गम भागातील १४० होतकरू बेरोजगार युवकांना हैदराबादसारख्या शहरात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे त्या युवकांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळणार असून दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक विकासाचा नवीन आशेचा किरण यानिमित्ताने दिसणार आहे.पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाने रोजगार मेळावा ॲप तयार केले. या ॲपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी नाव नोंदणी केली. त्यानुसार जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली आदी उपविभागांतर्गत येणाऱ्या दुर्गम गावांमधील १४० बेरोजगारांना हैदराबादच्या एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनीही आनंद व्यक्त केला. या काऱ्यक्रमासाठी संबंधित उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांसल नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विकासासाठी ठरणार मैलाचा दगडनक्षलवादी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे आणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांची दिशाभूल करून दलममध्ये भरती करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे अनेक तरुण गुणवत्ता असूनही रोजगारापासून वंचित राहीले आहेत. पण त्या तरुणांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक गोयल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राबविला गेलेला हा उपक्रम नक्षलविरोधी अभियानासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासाला चालना देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर असलेली बेराेजगारीची समस्या आणि त्याचा नक्षलवाद्यांकडून घेतला जाणारा गैरफायदा टाळण्यासाठी पाेलीस विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे स्वागत हाेत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस