शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई

By दिगांबर जवादे | Updated: February 22, 2024 22:08 IST

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे.

गडचिरोली: जिल्ह्यातील विविध पाेलिस स्टेशनतर्फे १३ कारवाया करून जप्त करण्यात आलेला सुमारे ४०७ किलाे गांजा पाेलिसांनी नष्ट केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या मार्गदर्शनात सदर गांजा नष्ट करण्यात आला.

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे पाेलिस या भागात सहजासहजी पाेहाेचत नाहीत. याचा गैरफायदा छत्तीसगड राज्यातील नागरिकांकडून घेतला जातो. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाची शेती करतात. पुढे हा गांजा गडचिराेली जिल्हा मार्गे राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पाठवला जातो. गाेपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून पाेलिसांनी कारवाया केल्या.

गडचिराेली पाेलिस स्टेशनच्या पाेलिसांनी ४, आसरअल्ली २, अहेरी ३, चामाेर्शी, धानाेरा, मुलचेरा, रेपनपल्ली पाेलिस स्टेशनने एक अशा एकूण १३ कारवाया करून ४०७ क्विंटल गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ नाश समितीच्या परवानगीनंतर गांजा नष्ट करण्यात आला आहे. अमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सदस्य अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, पोलिस उपअधीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक उल्हास भुसारी, रासायनिक विश्लेषक विलास शिवाजी ठानगे, वजन मापे विभागाचे निरीक्षक प्रकाश उके, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच लाचुलू मडावी, अक्षय राऊत यांच्या परवागनीनंतर गांजा नष्ट करण्यात आला.

गांजा नष्ट करण्याची कारवाई करतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पाेलिस उपनिरीक्षक सरिता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अंमलदार नरेश सहारे, दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंत गेडाम, सुनील पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थGadchiroliगडचिरोली