शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी ग्रा.पं.चे ठराव पाठवा

By admin | Updated: September 29, 2015 02:58 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी

ंगडचिरोली : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत असून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला पाठवावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पंकज गुड्डेवार, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि.प. गट नेते केसरी उसेंडी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, अ‍ॅड. गजानन दुगा, सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, सतिश विधाते, भामरागड तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, मुलचेरा तालुकाध्यक्ष रवींद्र शहा, विलास ढोरे, रजनीकांत मोटघरे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम, नंदू वाईलकर, सुरेश भांडेकर, निकेश नैताम, देवाजी सोनटक्के, केदारनाथ कुंभारे, आशिष सुफी, रामभाऊ नन्नावारे, नरेंद्र भरडकर आदी उपस्थित होते.आगामी काळात जिल्ह्यात १० नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. नगर पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवाव्या. नगर पंचायतीला निवडून येणाऱ्या सदस्यास विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केले. काँग्रेस पक्ष या निवडणुका स्वबळावर लढणार असून स्थानिक लोकांनी उमेदवारांची नावे पॅनलमध्ये टाकून ती यादी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे पाठवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेसच्या कुठल्याही संघटना व विंगने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व तालुका काँग्रेस अध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही उपक्रम राबवू नये, अशी सूचनाही या बैठकीतून करण्यात आली. या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व केसरी उसेंडी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जिल्हास्तरावर घेतलेली नियोजन समितीची बैठक ही पक्षाची बैठक समजून घेतली. यात विकास आणि नियोजनावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी घणाघाती टीका केली. (स्थानिक प्रतिनिधी)