शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी ग्रा.पं.चे ठराव पाठवा

By admin | Updated: September 29, 2015 02:58 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी

ंगडचिरोली : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत असून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला पाठवावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पंकज गुड्डेवार, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि.प. गट नेते केसरी उसेंडी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, अ‍ॅड. गजानन दुगा, सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, सतिश विधाते, भामरागड तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, मुलचेरा तालुकाध्यक्ष रवींद्र शहा, विलास ढोरे, रजनीकांत मोटघरे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम, नंदू वाईलकर, सुरेश भांडेकर, निकेश नैताम, देवाजी सोनटक्के, केदारनाथ कुंभारे, आशिष सुफी, रामभाऊ नन्नावारे, नरेंद्र भरडकर आदी उपस्थित होते.आगामी काळात जिल्ह्यात १० नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. नगर पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवाव्या. नगर पंचायतीला निवडून येणाऱ्या सदस्यास विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केले. काँग्रेस पक्ष या निवडणुका स्वबळावर लढणार असून स्थानिक लोकांनी उमेदवारांची नावे पॅनलमध्ये टाकून ती यादी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे पाठवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेसच्या कुठल्याही संघटना व विंगने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व तालुका काँग्रेस अध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही उपक्रम राबवू नये, अशी सूचनाही या बैठकीतून करण्यात आली. या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व केसरी उसेंडी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जिल्हास्तरावर घेतलेली नियोजन समितीची बैठक ही पक्षाची बैठक समजून घेतली. यात विकास आणि नियोजनावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी घणाघाती टीका केली. (स्थानिक प्रतिनिधी)