शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी ग्रा.पं.चे ठराव पाठवा

By admin | Updated: September 29, 2015 02:58 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी

ंगडचिरोली : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत असून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला पाठवावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पंकज गुड्डेवार, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि.प. गट नेते केसरी उसेंडी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, अ‍ॅड. गजानन दुगा, सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, सतिश विधाते, भामरागड तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, मुलचेरा तालुकाध्यक्ष रवींद्र शहा, विलास ढोरे, रजनीकांत मोटघरे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम, नंदू वाईलकर, सुरेश भांडेकर, निकेश नैताम, देवाजी सोनटक्के, केदारनाथ कुंभारे, आशिष सुफी, रामभाऊ नन्नावारे, नरेंद्र भरडकर आदी उपस्थित होते.आगामी काळात जिल्ह्यात १० नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. नगर पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवाव्या. नगर पंचायतीला निवडून येणाऱ्या सदस्यास विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केले. काँग्रेस पक्ष या निवडणुका स्वबळावर लढणार असून स्थानिक लोकांनी उमेदवारांची नावे पॅनलमध्ये टाकून ती यादी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे पाठवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेसच्या कुठल्याही संघटना व विंगने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व तालुका काँग्रेस अध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही उपक्रम राबवू नये, अशी सूचनाही या बैठकीतून करण्यात आली. या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व केसरी उसेंडी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जिल्हास्तरावर घेतलेली नियोजन समितीची बैठक ही पक्षाची बैठक समजून घेतली. यात विकास आणि नियोजनावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी घणाघाती टीका केली. (स्थानिक प्रतिनिधी)