शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आरमोरीत पुरेसा पाणीपुरवठा द्यावा

By admin | Updated: June 20, 2015 02:18 IST

आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

वीज समस्या सोडवा : नगर पंचायतीच्या प्रशासकांना निवेदनआरमोरी : आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सदर समस्या नगर पंचायतीच्या प्रशासकांनी सोडवाव्यात, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मागील एक महिन्यापासून आरमोरी तालुक्यात सातत्याने विजेचा लंपडाव चालू आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एकदा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर सहा ते सात तास पूर्ववत होत नाही. आरमोरी शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गाढवी नदीवरील पाणी गढूळ असल्यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. केवळ वैनगंगा नदीवर अस्तित्त्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून ३० हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही समस्या लक्षात आणून दिली. त्याचबरोबर पथदिवे, शहरातील अतिक्रमण सोडविण्यात यावे, अशीही मागणी केली.आरमोरी शहरातील नाल्यांचा वेळोवेळी उपसा केला जात नाही. त्यामुळे अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील कचऱ्याचीही विल्हेवाट लावली जात नाही. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, ज्ञानेश्वर ढवगाये, पंकज खरवडे, गणेश बैरवार, वेणू ढवगाये, नंदू नाकतोडे, राजू कंकटवार, महेंद्र शेंडे, रोहीत धकाते, गोलू वाघरे, अंकुश खरवडे, चंदू आकरे, सचिन बेहरे, सूरज हेमके, स्वप्नील धात्रक, संजय सोनटक्के, संगीता रेवतकर, रोशनी बैस, युगल सामृतवार उपस्थित होते.