शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

आरमोरीत पुरेसा पाणीपुरवठा द्यावा

By admin | Updated: June 20, 2015 02:18 IST

आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

वीज समस्या सोडवा : नगर पंचायतीच्या प्रशासकांना निवेदनआरमोरी : आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सदर समस्या नगर पंचायतीच्या प्रशासकांनी सोडवाव्यात, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मागील एक महिन्यापासून आरमोरी तालुक्यात सातत्याने विजेचा लंपडाव चालू आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एकदा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर सहा ते सात तास पूर्ववत होत नाही. आरमोरी शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गाढवी नदीवरील पाणी गढूळ असल्यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. केवळ वैनगंगा नदीवर अस्तित्त्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून ३० हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही समस्या लक्षात आणून दिली. त्याचबरोबर पथदिवे, शहरातील अतिक्रमण सोडविण्यात यावे, अशीही मागणी केली.आरमोरी शहरातील नाल्यांचा वेळोवेळी उपसा केला जात नाही. त्यामुळे अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील कचऱ्याचीही विल्हेवाट लावली जात नाही. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, ज्ञानेश्वर ढवगाये, पंकज खरवडे, गणेश बैरवार, वेणू ढवगाये, नंदू नाकतोडे, राजू कंकटवार, महेंद्र शेंडे, रोहीत धकाते, गोलू वाघरे, अंकुश खरवडे, चंदू आकरे, सचिन बेहरे, सूरज हेमके, स्वप्नील धात्रक, संजय सोनटक्के, संगीता रेवतकर, रोशनी बैस, युगल सामृतवार उपस्थित होते.