शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

आघाडी शासनाकडून योजनांचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 02:13 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला.

रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन : कुरखेडा शहरात जाहीर सभाकुरखेडा : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला. महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आघाडी शासनच जबाबदार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.कुरखेडा येथील गांधी चौकात गुरूवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मंचावर भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, सचिव विलास भांडेकर, अल्प संख्यांक आघाडी अध्यक्ष बबलू हुसैनी, तालुका अध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, नागेश फाये, खेमनाथ डोंगरवार उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, आघाडी शासनाने सुमारे ७० हजार कोटी रूपये खर्च करीत फक्त एक टक्का सिंचन सुविधा निर्माण केली. या योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ झाला नाही. त्यामुळे शेतकरी मागे पडला आहे. आघाडी शासनाच्या बहुतांश योजना कुचकामी ठरल्याने भाजपा सरकारने या योजना बंद केल्या आहेत. शासनाने जलयुक्त शिवार ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एका वर्षात फक्त १ हजार ४०० कोटी रूपये खर्च करीत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. आघाडी शासनाने कालावधीत २४ टीएमसी पाणी अडविण्यासाठी आठ वर्षांचा दीर्घ कालावधी लागला व त्यावर पाच हजार कोटी रूपयांचा खर्च झाला. काँग्रेसचे नेते सोन्याच्या ताटात खाणारे काँग्रेसचे नेते म्हणजे, पुतना, मावशीचे प्रेम असल्याची टिकाही दानवे यांनी केली. भाजप सरकारच्या काळात गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर हाच केंद्रस्थानी आहे व त्यांच्यासाठीच विविध योजना राबविल्या जात आहे, असे त्यांनी सांगितले.या जाहीरसभेत खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होण्यास मदत होईल. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठीही शासन प्रयत्न करीत आहे. महामार्गांच्या निर्मितीमुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे कामही लवकरच सुरू केले जाईल. या सर्व कामांसाठी निधी कमतरता केंद्र व राज्य शासन कधीच पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या जाहीर सभेचे प्रास्ताविक आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. त्यांनी विकासकामाचा पाढा वाचला. संचालन जिल्हा सचिव चांगदेव फाये तर आभार रवींद्र गोटेफोडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)