शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

आघाडी शासनाकडून योजनांचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 02:13 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला.

रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन : कुरखेडा शहरात जाहीर सभाकुरखेडा : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला. महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आघाडी शासनच जबाबदार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.कुरखेडा येथील गांधी चौकात गुरूवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मंचावर भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, सचिव विलास भांडेकर, अल्प संख्यांक आघाडी अध्यक्ष बबलू हुसैनी, तालुका अध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, नागेश फाये, खेमनाथ डोंगरवार उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, आघाडी शासनाने सुमारे ७० हजार कोटी रूपये खर्च करीत फक्त एक टक्का सिंचन सुविधा निर्माण केली. या योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ झाला नाही. त्यामुळे शेतकरी मागे पडला आहे. आघाडी शासनाच्या बहुतांश योजना कुचकामी ठरल्याने भाजपा सरकारने या योजना बंद केल्या आहेत. शासनाने जलयुक्त शिवार ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एका वर्षात फक्त १ हजार ४०० कोटी रूपये खर्च करीत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. आघाडी शासनाने कालावधीत २४ टीएमसी पाणी अडविण्यासाठी आठ वर्षांचा दीर्घ कालावधी लागला व त्यावर पाच हजार कोटी रूपयांचा खर्च झाला. काँग्रेसचे नेते सोन्याच्या ताटात खाणारे काँग्रेसचे नेते म्हणजे, पुतना, मावशीचे प्रेम असल्याची टिकाही दानवे यांनी केली. भाजप सरकारच्या काळात गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर हाच केंद्रस्थानी आहे व त्यांच्यासाठीच विविध योजना राबविल्या जात आहे, असे त्यांनी सांगितले.या जाहीरसभेत खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होण्यास मदत होईल. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठीही शासन प्रयत्न करीत आहे. महामार्गांच्या निर्मितीमुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे कामही लवकरच सुरू केले जाईल. या सर्व कामांसाठी निधी कमतरता केंद्र व राज्य शासन कधीच पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या जाहीर सभेचे प्रास्ताविक आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. त्यांनी विकासकामाचा पाढा वाचला. संचालन जिल्हा सचिव चांगदेव फाये तर आभार रवींद्र गोटेफोडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)