शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी शासनाकडून योजनांचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 02:13 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला.

रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन : कुरखेडा शहरात जाहीर सभाकुरखेडा : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला. महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आघाडी शासनच जबाबदार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.कुरखेडा येथील गांधी चौकात गुरूवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मंचावर भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, सचिव विलास भांडेकर, अल्प संख्यांक आघाडी अध्यक्ष बबलू हुसैनी, तालुका अध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, नागेश फाये, खेमनाथ डोंगरवार उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, आघाडी शासनाने सुमारे ७० हजार कोटी रूपये खर्च करीत फक्त एक टक्का सिंचन सुविधा निर्माण केली. या योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ झाला नाही. त्यामुळे शेतकरी मागे पडला आहे. आघाडी शासनाच्या बहुतांश योजना कुचकामी ठरल्याने भाजपा सरकारने या योजना बंद केल्या आहेत. शासनाने जलयुक्त शिवार ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एका वर्षात फक्त १ हजार ४०० कोटी रूपये खर्च करीत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. आघाडी शासनाने कालावधीत २४ टीएमसी पाणी अडविण्यासाठी आठ वर्षांचा दीर्घ कालावधी लागला व त्यावर पाच हजार कोटी रूपयांचा खर्च झाला. काँग्रेसचे नेते सोन्याच्या ताटात खाणारे काँग्रेसचे नेते म्हणजे, पुतना, मावशीचे प्रेम असल्याची टिकाही दानवे यांनी केली. भाजप सरकारच्या काळात गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर हाच केंद्रस्थानी आहे व त्यांच्यासाठीच विविध योजना राबविल्या जात आहे, असे त्यांनी सांगितले.या जाहीरसभेत खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होण्यास मदत होईल. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठीही शासन प्रयत्न करीत आहे. महामार्गांच्या निर्मितीमुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे कामही लवकरच सुरू केले जाईल. या सर्व कामांसाठी निधी कमतरता केंद्र व राज्य शासन कधीच पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या जाहीर सभेचे प्रास्ताविक आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. त्यांनी विकासकामाचा पाढा वाचला. संचालन जिल्हा सचिव चांगदेव फाये तर आभार रवींद्र गोटेफोडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)