शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

शारीरिक अंतर तारक, तर भावनिक अंतर ठरू शकते मारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे.

ठळक मुद्देआजार नियंत्रणासाठी सकारात्मक राहा : विलगीकरणातील लोकांवर मात्र मानसिक दडपण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सामाजिक जीवन बदलून टाकणाऱ्या कोरोना विषाणुची पावले आता सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही पडली आहेत. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. गडचिरोलीच्या रानावनात फिरणाºया कणखर नागरिकांना कोरोनाचा विषाणू सहजपणे आपल्या कवेत घेणे शक्य नाही, मात्र कोरोनाच्या भितीपोटी शारीरिक अंतरासोबत ठेवले जात असलेले भावनिक अंतर सामान्य नागरिकालाही रुग्ण बनविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. मात्र विलगिकरण कक्षात ठेवलेले लोक जणूकाही कोरोनाबाधित रुग्णच आहेत आणि त्यांना कोरोना झाला म्हणजे त्यांनी काहीतरी अपराध केला आहे, अशा भावनेतून त्यांच्याकडे लोक पाहात आहेत. विशेष म्हणजे विलगिकरण कक्षात किंवा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेले लोक स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर निश्चिंतपणे घरी जातात. पण संशयमुक्त झाल्यानंतरही लोक त्यांच्यापासून अंतर ठेवून वागत आहेत. ही बाब अनेकांना कोड्यात टाकत आहे.विषाणूची बाधा होऊ नये म्हणून एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवण्याचा नियम पाळण्याची सवय आता पुढील अनेक महिने सर्वांनाच करावी लागणार आहे. मात्र हे करताना एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, आपलेपणा, माणुसकी कमी झाल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाहेर जिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजूरवर्गासह अनेकांना गावात घेण्यासही लोक तयार होत नव्हते. यासाठी आरोग्य विभागाला योग्य ती जनजागृती करावी लागणार आहे.त्यांना हवी होम क्वॉरंटाईनची मुभाजिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७३५ लोक संस्थात्मक विलगिकरणात आहेत. ज्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगिकरण कक्षात आणून १४ दिवस ठेवले जात आहे. रुग्णसंख्या वाढल्यास विलगिकरण कक्षासाठी शाळा-वसतिगृहे कमी पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना, जर त्यांच्या निवासस्थानी विलगिकरण कक्षाप्रमाणे स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह आणि इतरांचा संपर्क येणार नाही अशी व्यवस्था असेल तर गृह विलगिकरणाची मुभा देणे गरजेचे आहे. यामुळे शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन संबंधित व्यक्तीलाही विलगिकरण कक्षातील वातावरणामुळे होणारा रुग्णासारखा आभास होणार नाही.मायेच्या उपचारातून मिळते सकारात्मक ऊर्जाअनेक ठिकाणच्या विलगिकरण कक्षात ५ ते १० जणांसाठी एकच शौचालय, स्रानगृह आहे. शिवाय जेवणासाठी डबा आणून देणाºया लोकांचा एखाद्या बाधित व्यक्तीशी संपर्क येऊन त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याऊलट घरी विलगिकरणाची पुरेशी सोय असणाºयांना ती मुभा दिल्यास कौटुंबिय मायेतून संबंधित व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळून ती व्यक्ती ठणठणीत राहू शकते. याचा आरोग्य प्रशासनाने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या