शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:15 IST

पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देयुतीसाठी शिवसेनेसोबत बोलणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पेट्रोल दरवाढीने सामान्य लोकच नाही तर आम्हीसुद्धा त्रस्त आहोत. आम्ही संवेदनशिल असल्यामुळे आम्हालाही त्याची झळ जाणवते. पण ही दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.सर्व लोकसभा मतदार संघात बुथ प्रमुखांच्या नियुक्तीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी शनिवारी (दि.२७) गडचिरोलीत पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. यावेळी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ. कीर्तीकुमार भांगडिया, नगराध्यक्ष योगिता पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दानवे म्हणाले, निवडणुकीसाठी राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी ८८ हजार बूथ प्रमुखांची नेमणूक भाजपने केली आहे. त्यातील ८३ हजार प्रमुखांशी प्रत्यक्ष फोनवर बोलून त्यांच्या नियुक्तीची खात्री झाली आहे. प्रत्येकी १० ते १२ घरे सांभाळणारे ७५०० कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा मतदार संघात तयार केले जात आहे. याशिवाय पूर्णवेळ विस्तारक सक्रिय आहेत. अनेक वर्षेपर्यंत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भाजपला २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश मोदींमुळे मिळाले हे खरे असले तरी मोदी हे भाजपपासून वेगळे नाहीत. त्यामुळे हे यश भाजपचेच आहे. २०१९ च्या निवडणुकीतही असेच यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याने युती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र युतीसंदर्भात कोणते निकष राहील हे उघड करण्यास दानवे यांनी नकार दिला. त्या निकषांबद्दल आम्ही त्यांच्याशीच चर्चा करणार असून आमचे आतून बोलणे सुरू असते, असेही दानवे म्हणाले.

दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढू शकतेसध्या जाहीर केलेली दुष्काळसदृश तालुक्यांची संख्या ही नजरअंदाज पैसेवारीवर जाहीर केली आहे. पीकांची परिस्थिती वाईट असणारे अनेक तालुके त्यातून सुटले आहेत. मात्र पुढे दुसऱ्या टप्प्यात तेही तालुके दुष्काळसदृश म्हणून जाहीर होऊ शकतात, अशी माहिती यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे