शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:15 IST

पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देयुतीसाठी शिवसेनेसोबत बोलणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पेट्रोल दरवाढीने सामान्य लोकच नाही तर आम्हीसुद्धा त्रस्त आहोत. आम्ही संवेदनशिल असल्यामुळे आम्हालाही त्याची झळ जाणवते. पण ही दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.सर्व लोकसभा मतदार संघात बुथ प्रमुखांच्या नियुक्तीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी शनिवारी (दि.२७) गडचिरोलीत पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. यावेळी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ. कीर्तीकुमार भांगडिया, नगराध्यक्ष योगिता पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दानवे म्हणाले, निवडणुकीसाठी राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी ८८ हजार बूथ प्रमुखांची नेमणूक भाजपने केली आहे. त्यातील ८३ हजार प्रमुखांशी प्रत्यक्ष फोनवर बोलून त्यांच्या नियुक्तीची खात्री झाली आहे. प्रत्येकी १० ते १२ घरे सांभाळणारे ७५०० कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा मतदार संघात तयार केले जात आहे. याशिवाय पूर्णवेळ विस्तारक सक्रिय आहेत. अनेक वर्षेपर्यंत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भाजपला २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश मोदींमुळे मिळाले हे खरे असले तरी मोदी हे भाजपपासून वेगळे नाहीत. त्यामुळे हे यश भाजपचेच आहे. २०१९ च्या निवडणुकीतही असेच यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याने युती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र युतीसंदर्भात कोणते निकष राहील हे उघड करण्यास दानवे यांनी नकार दिला. त्या निकषांबद्दल आम्ही त्यांच्याशीच चर्चा करणार असून आमचे आतून बोलणे सुरू असते, असेही दानवे म्हणाले.

दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढू शकतेसध्या जाहीर केलेली दुष्काळसदृश तालुक्यांची संख्या ही नजरअंदाज पैसेवारीवर जाहीर केली आहे. पीकांची परिस्थिती वाईट असणारे अनेक तालुके त्यातून सुटले आहेत. मात्र पुढे दुसऱ्या टप्प्यात तेही तालुके दुष्काळसदृश म्हणून जाहीर होऊ शकतात, अशी माहिती यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे