शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:15 IST

पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देयुतीसाठी शिवसेनेसोबत बोलणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पेट्रोल दरवाढीने सामान्य लोकच नाही तर आम्हीसुद्धा त्रस्त आहोत. आम्ही संवेदनशिल असल्यामुळे आम्हालाही त्याची झळ जाणवते. पण ही दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.सर्व लोकसभा मतदार संघात बुथ प्रमुखांच्या नियुक्तीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी शनिवारी (दि.२७) गडचिरोलीत पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. यावेळी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ. कीर्तीकुमार भांगडिया, नगराध्यक्ष योगिता पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दानवे म्हणाले, निवडणुकीसाठी राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी ८८ हजार बूथ प्रमुखांची नेमणूक भाजपने केली आहे. त्यातील ८३ हजार प्रमुखांशी प्रत्यक्ष फोनवर बोलून त्यांच्या नियुक्तीची खात्री झाली आहे. प्रत्येकी १० ते १२ घरे सांभाळणारे ७५०० कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा मतदार संघात तयार केले जात आहे. याशिवाय पूर्णवेळ विस्तारक सक्रिय आहेत. अनेक वर्षेपर्यंत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भाजपला २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश मोदींमुळे मिळाले हे खरे असले तरी मोदी हे भाजपपासून वेगळे नाहीत. त्यामुळे हे यश भाजपचेच आहे. २०१९ च्या निवडणुकीतही असेच यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याने युती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र युतीसंदर्भात कोणते निकष राहील हे उघड करण्यास दानवे यांनी नकार दिला. त्या निकषांबद्दल आम्ही त्यांच्याशीच चर्चा करणार असून आमचे आतून बोलणे सुरू असते, असेही दानवे म्हणाले.

दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढू शकतेसध्या जाहीर केलेली दुष्काळसदृश तालुक्यांची संख्या ही नजरअंदाज पैसेवारीवर जाहीर केली आहे. पीकांची परिस्थिती वाईट असणारे अनेक तालुके त्यातून सुटले आहेत. मात्र पुढे दुसऱ्या टप्प्यात तेही तालुके दुष्काळसदृश म्हणून जाहीर होऊ शकतात, अशी माहिती यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे