शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मिरची उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतात व घरी पडून : कोरोनाच्या संचारबंदीने वाहतूक व विक्री थांबली

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनाच्या संचारबंदीने दळणवळण, वाहतूक व बाजारपेठ बंद असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लाखो रूपयांची गुंतवणूक करून पिकविलेली लाल मिरची विक्रीअभावी शेतशिवार तसेच घरी पडून आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी मिरची उन्हात वाळल्यानंतर मिरची घरी असलेल्या ढोलीमध्ये सुरक्षितरित्या ठेवली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील व्यापाऱ्यांना मिरची विकण्याचा प्रयत्न केला. मात्र मिरचीची विक्री करता आली नाही. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे संकट उद्भवले. संचारबंदी व बाजारपेठ बंदमुळे शेतमालाची वाहतूक थांबली. उत्पादित मिरची विक्रीअभावी पडून असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लालरंगाची मिरची पांढरी पडत असून भाव कमी मिळण्याच्या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले आहेत.माल नेण्याची मुभा द्याएक हेक्टर क्षेत्राच्या मिरची पिकासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रूपये खर्च येतो. मोठी गुंतवणूक करूनही मिरची बाजारपेठेत पोहोचू न शकल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नागपूरच्या मिरची बाजारात सिरोंचातील मिरची नेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी