शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

सूरजागड प्रकल्पाविरोधात रोष; संतप्त व्यापारी बैठकीत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:16 IST

जनआंदोलनाची तयारी: बैठकीत आश्वासनावर बोळवण; धूळ, प्रदूषणातून आरोग्याशी खेळ

आलापल्ली (गडचिरोली) : बेदरकार वाहतूक, रोज शेकडो वाहनांची रेलचेल, गोंगाट, धूळ, प्रदूषण अन् सतत होणारे अपघात यामुळे आलापल्लीकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. २० मे रोजी शिक्षकाचा बळी गेल्यानंतर २१ मे रोजी पोलिस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व्यापारी व लॉयड मेटल्स कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अहेरीत झाली. यावेळी व्यापारी व स्थानिकांनी सूरजागड लोहखाण प्रकल्पाविरोधात तीव्र संताप व रोष व्यक्त केला.

कंपनीच्या प्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर बोळवण केली. त्यामुळे नागरिकांनी जनआंदोलनाची तयारी केली आहे. आलापल्लीहून नागेपल्लीकडे दुचाकीवरून निघालेले आश्रमशाळा शिक्षक वसुदेव मंगा कुळमेथे (वय ४५, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) यांचा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २० मे रोजी घडली. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय कुळमेथे यांच्या नातेवाइकांनी भररस्त्यात ठिय्या देत राेष व्यक्त केला होता. २१ मे राेजी अहेरीतील प्राणहिता पोलिस कॅम्प येथे बैठक झाली. यावेळी उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, सरपंच शंकर मेश्राम, मुनेश्वर हडपे, महावीर अग्रवाल, राजेश गोयल, विजय निमलवार, अज्जू पठाण, विनोद कावेरी, विजय गुप्ता, अमोल कोलपकवार व लॉयड मेटल्स कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प

दरम्यान, सूरजागड खाणीतील लोह वाहतुकीमुळे जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मिठाची गुळणी धरली आहे. खासदारांसह तिन्ही आमदार यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बेदरकार वाहतुकीने सामान्यांचे बळी जात असताना लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून का बसलेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.

या प्रश्नांवर गाजली बैठक....

अहेरीत झालेल्या बैठकीत आलापल्लीतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, शाळेच्या वेळेत जड वाहने बंद ठेवावीत, धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज स्वच्छता करावी, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांत शंभर मीटर अंतर ठेवावे, रुग्णवाहिका उपलब्ध करावी, आलापल्ली ते नागेपल्लीदरम्यान पथदिवे व सीसीटीव्ही लावावेत, अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले.

...म्हणून स्थानिकांमध्ये नाराजी

यापूर्वी खुद्द जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी आलापल्लीत बैठक घेऊन सूरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे होणारा त्रास व अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांतच स्थानिकांची निराशा झाली. अपघातसत्र , धूळ, प्रदूषणाचा त्रास कमी होत नाही. त्यामुळे आताही केवळ आश्वासने दिली. त्याची पूर्तता होईल की नाही, याची शंका असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी कायम आहे.

टॅग्स :localलोकलGadchiroliगडचिरोली