शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

सूरजागड प्रकल्पाविरोधात रोष; संतप्त व्यापारी बैठकीत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:16 IST

जनआंदोलनाची तयारी: बैठकीत आश्वासनावर बोळवण; धूळ, प्रदूषणातून आरोग्याशी खेळ

आलापल्ली (गडचिरोली) : बेदरकार वाहतूक, रोज शेकडो वाहनांची रेलचेल, गोंगाट, धूळ, प्रदूषण अन् सतत होणारे अपघात यामुळे आलापल्लीकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. २० मे रोजी शिक्षकाचा बळी गेल्यानंतर २१ मे रोजी पोलिस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व्यापारी व लॉयड मेटल्स कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अहेरीत झाली. यावेळी व्यापारी व स्थानिकांनी सूरजागड लोहखाण प्रकल्पाविरोधात तीव्र संताप व रोष व्यक्त केला.

कंपनीच्या प्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर बोळवण केली. त्यामुळे नागरिकांनी जनआंदोलनाची तयारी केली आहे. आलापल्लीहून नागेपल्लीकडे दुचाकीवरून निघालेले आश्रमशाळा शिक्षक वसुदेव मंगा कुळमेथे (वय ४५, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) यांचा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २० मे रोजी घडली. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय कुळमेथे यांच्या नातेवाइकांनी भररस्त्यात ठिय्या देत राेष व्यक्त केला होता. २१ मे राेजी अहेरीतील प्राणहिता पोलिस कॅम्प येथे बैठक झाली. यावेळी उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, सरपंच शंकर मेश्राम, मुनेश्वर हडपे, महावीर अग्रवाल, राजेश गोयल, विजय निमलवार, अज्जू पठाण, विनोद कावेरी, विजय गुप्ता, अमोल कोलपकवार व लॉयड मेटल्स कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प

दरम्यान, सूरजागड खाणीतील लोह वाहतुकीमुळे जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मिठाची गुळणी धरली आहे. खासदारांसह तिन्ही आमदार यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बेदरकार वाहतुकीने सामान्यांचे बळी जात असताना लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून का बसलेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.

या प्रश्नांवर गाजली बैठक....

अहेरीत झालेल्या बैठकीत आलापल्लीतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, शाळेच्या वेळेत जड वाहने बंद ठेवावीत, धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज स्वच्छता करावी, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांत शंभर मीटर अंतर ठेवावे, रुग्णवाहिका उपलब्ध करावी, आलापल्ली ते नागेपल्लीदरम्यान पथदिवे व सीसीटीव्ही लावावेत, अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले.

...म्हणून स्थानिकांमध्ये नाराजी

यापूर्वी खुद्द जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी आलापल्लीत बैठक घेऊन सूरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे होणारा त्रास व अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांतच स्थानिकांची निराशा झाली. अपघातसत्र , धूळ, प्रदूषणाचा त्रास कमी होत नाही. त्यामुळे आताही केवळ आश्वासने दिली. त्याची पूर्तता होईल की नाही, याची शंका असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी कायम आहे.

टॅग्स :localलोकलGadchiroliगडचिरोली