शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

मेळाव्यातून शासन लोकांच्या दारी

By admin | Updated: April 11, 2017 01:01 IST

नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.

पोलिसांचा पुढाकार : दुर्गम भागात २००५ पासून ११३७ जनजागरण मेळावे गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. २००५ पासून ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ११३७ जनजागरण मेळाव्यातून पोलीस प्रशासनाने हजारो लोकांशी संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात नक्षलवादी कारवायांच्या उदय झाला. याचा थेट परिणाम विकास प्रक्रियेवर झाला. सुरुवातीच्या काळात दुर्गम व अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या विचारांना समर्थन देणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र कालांतराने सरकार व पोलीस यंत्रणेने लोकांशी संवाद वाढविला. यासाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी अशा आयुधांचा वापर केला जाऊ लागला. गडचिरोली या मागास जिल्ह्यात पोलीस हे प्रशासनच मुख्य अंग आहे. त्यामुळे पोलिसांनी या कामात पुढाकार घेतला. २००५ मध्ये ९९, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये ४१, २००८ मध्ये २२, २००९ साली ४२, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये २०, २०१२ मध्ये ५२, २०१३ मध्ये २१३, २०१४ मध्ये १७९, २०१५ मध्ये २१६, २०१६ मध्ये १९६ व २०१७ मध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ९ जनजागरण मेळावे पार पडले. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महसूल प्रशासनाच्या अनेक प्रमाणपत्रांचे वाटप नागरिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. आरोग्य, वन, आदिवासी विकास, पशुसंवर्धन आदी विभागाच्या योजनांची माहिती देऊन त्याचे अर्जही या मेळाव्यातून लाभार्थ्यांकडून भरून घेतले जाऊ लागले. तसेच गावातील तरूण युवक, युवतींसाठी क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन अलिकडच्या काळात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून केले जाऊ लागले आहे. मेळाव्यात नागरिकांना संसारोपयोगी साहित्यांचेही वितरण केले जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही काही जनजागरण मेळाव्यांना हजेरी लावून लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सोबत राहून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले.जनजागरण मेळाव्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण भागात नक्षलवाद्यांचा दबाव कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनजागरण मेळावे व एकूण सोशल पोलिसिंग हे पोलीस यंत्रणेचा कणा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)