शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यातून शासन लोकांच्या दारी

By admin | Updated: April 11, 2017 01:01 IST

नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.

पोलिसांचा पुढाकार : दुर्गम भागात २००५ पासून ११३७ जनजागरण मेळावे गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. २००५ पासून ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ११३७ जनजागरण मेळाव्यातून पोलीस प्रशासनाने हजारो लोकांशी संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात नक्षलवादी कारवायांच्या उदय झाला. याचा थेट परिणाम विकास प्रक्रियेवर झाला. सुरुवातीच्या काळात दुर्गम व अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या विचारांना समर्थन देणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र कालांतराने सरकार व पोलीस यंत्रणेने लोकांशी संवाद वाढविला. यासाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी अशा आयुधांचा वापर केला जाऊ लागला. गडचिरोली या मागास जिल्ह्यात पोलीस हे प्रशासनच मुख्य अंग आहे. त्यामुळे पोलिसांनी या कामात पुढाकार घेतला. २००५ मध्ये ९९, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये ४१, २००८ मध्ये २२, २००९ साली ४२, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये २०, २०१२ मध्ये ५२, २०१३ मध्ये २१३, २०१४ मध्ये १७९, २०१५ मध्ये २१६, २०१६ मध्ये १९६ व २०१७ मध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ९ जनजागरण मेळावे पार पडले. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महसूल प्रशासनाच्या अनेक प्रमाणपत्रांचे वाटप नागरिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. आरोग्य, वन, आदिवासी विकास, पशुसंवर्धन आदी विभागाच्या योजनांची माहिती देऊन त्याचे अर्जही या मेळाव्यातून लाभार्थ्यांकडून भरून घेतले जाऊ लागले. तसेच गावातील तरूण युवक, युवतींसाठी क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन अलिकडच्या काळात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून केले जाऊ लागले आहे. मेळाव्यात नागरिकांना संसारोपयोगी साहित्यांचेही वितरण केले जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही काही जनजागरण मेळाव्यांना हजेरी लावून लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सोबत राहून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले.जनजागरण मेळाव्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण भागात नक्षलवाद्यांचा दबाव कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनजागरण मेळावे व एकूण सोशल पोलिसिंग हे पोलीस यंत्रणेचा कणा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)