शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खा.अशोक नेते यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करून जिल्ह्यातील अडीअडचणी सांगितल्या. परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मदत द्यावी तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली.

ठळक मुद्देआमदारांनी मांडला सिंचनाचा मुद्दा : खासदारांनी वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनसह उद्योग निर्मितीकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अविकसित, उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे साकडे खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या दोनही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घातले.नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खा.अशोक नेते यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करून जिल्ह्यातील अडीअडचणी सांगितल्या. परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मदत द्यावी तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली. याशिवाय निवेदनात कृषी, उद्योग, दूरसंचार सेवा, पर्यटन, वडसा-गडचिरोली रेल्वे लाईन आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यात आले. अतिक्रमीत वनजमिनीला स्थायी पट्टे देण्यात यावे, सूरजागड प्रकल्प सुरू करून खनन व सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा. महावितरणचे वीज बिल न भरल्यामुळे बऱ्याच भागातील दूरसंचार सेवा खंडित झाली आहे. परिणामी भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. थकीत वीज बिल भरण्याची कार्यवाही करावी. मार्र्कं डादेव येथे महाशिवरात्रीला भरणाºया यात्रेसाठी सोयीसुविधा पुरवाव्यात, तसेच मंदिर दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनकरिता वनजमिनीचे भूसंपादन जलदगतीने करावे. सर्व केंद्रावर बारदाण्याची सुविधा करावी. किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी करावी. गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात निरूपयोगी असलेले गाळे व जागा सुशिक्षित बेरोजगारांना द्यावे, घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसाठी वनजमीन संपादन करावे. गडचिरोली शहरात वनोेद्यानाची निर्मिती करावी, गोकूलनगरलगतच्या तलावाचे सौंदर्यीकरण करावे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. कठाणी नदीवरील जुन्या पुलाचे बंधाºयामध्ये रूपांतर करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याची मागणीगडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन व काम पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करावे परंतु निधी नसल्याच्या कारणावरून मंजूर झालेले कोणतेही काम रद्द करू नये, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. याशिवाय कोटगल, बॅरेज, तळोधी उपसा सिंचन, राजीव गांधी उपसा सिंचन, कोटगल उपसा सिंचन योजनेची कामे पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. कोनसरी येथे पोलाद निर्मिती कारखाना सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, प्रत्येक शेतकऱ्यांना दोन गायी, दोन म्हशी, दोन शेळ्या देऊन जोधंद्यास प्रोत्साहित करावे. मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून एमआयडी अंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावे, अशी मागणी डॉ.होळी यांनी केली.आरमोरीचे आ.कृष्णा गजबे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. विशेष बाब म्हणून विकासात गडचिरोली जिल्ह्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे