शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

नक्षलपीडित कुटुंबीयांनी दिला शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:48 IST

गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया .....

ठळक मुद्देअहिंसा दिनानिमित्त रॅली : अधिकार देण्यासाठी शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया जिल्ह्याच्या विविध भागांतील नागरिकांनी सोमवारी अहिंसा दिनानिमित्त आपली व्यथा प्रशासनापुढे मांडत नागरिकांनाही शांतीचा संदेश दिला.शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्ह्यातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहीद कुटुंबीयांनी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ ‘नक्षलवाद मुदार्बाद’ च्या घोषणा देत आधी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चौकातून रॅली काढून नक्षल्यांकडून होणाºया त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.नक्षल्यांनी आतापर्यंत अनेक शाळा पाडल्या, मुलांचे शिक्षण रोखले. शासनाच्या महाराष्टÑ दर्शन सहलीच्या माध्यमातून राज्यातील इतर जिल्ह्यांची झालेली प्रगती पाहणाºया आमच्या मुलांनी सहलीला जावू नये म्हणून धमकावणारे नक्षलवादी हे स्वत:च्या मुलांना मात्र मोठ्या विद्यापीठात शिकवत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच नक्षलवादी हे गोरगरीब आदिवासींच्या मजुरीचा पैसा खंडणी म्हणून गोळा करतात व रेती, खनिज, रिअल इस्टेट मध्ये स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवतात ही वास्तव व विदारक परिस्थितीही सर्व कुटुंबियांनी मांडली.याचबरोबर जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प व दळणवळण सुविधा उभारुन आदिवासी बांधवांचा खºया अर्थाने विकास करावा, अशी मागणी देखील यावेळी नक्षलपीडित कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आलेल्या या पीडित कुटुंबियांमध्ये वृद्ध नागरिक, काही महिला तसेच मुलेही होती. या सर्वांच्या कुटुंबातील व्यक्ती नक्षली हिंसाचाराला बळी पडले आहेत. त्यांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते.४९१ निष्पाप आदिवासींच्या हत्येसाठी जबाबदार कोण?देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खून होऊनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा खडा सवाल नक्षलपीडित कुटुंबीयांनी निवेदनामध्ये केला आहे.मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरीने शस्त्रे देऊन देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाºया या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही सवाल कुटुंबियांनी केला.प्रथमच अशा पद्धतीने नक्षलपीडित कुटुंबीय शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करीत रस्त्यावर उतरल्यामुळे गडचिरोली नागरिक त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत होते. या शांतता रॅलीसाठी पोलिसांसह काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जागृती केली.