शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

नक्षलपीडित कुटुंबीयांनी दिला शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:48 IST

गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया .....

ठळक मुद्देअहिंसा दिनानिमित्त रॅली : अधिकार देण्यासाठी शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया जिल्ह्याच्या विविध भागांतील नागरिकांनी सोमवारी अहिंसा दिनानिमित्त आपली व्यथा प्रशासनापुढे मांडत नागरिकांनाही शांतीचा संदेश दिला.शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्ह्यातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहीद कुटुंबीयांनी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ ‘नक्षलवाद मुदार्बाद’ च्या घोषणा देत आधी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चौकातून रॅली काढून नक्षल्यांकडून होणाºया त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.नक्षल्यांनी आतापर्यंत अनेक शाळा पाडल्या, मुलांचे शिक्षण रोखले. शासनाच्या महाराष्टÑ दर्शन सहलीच्या माध्यमातून राज्यातील इतर जिल्ह्यांची झालेली प्रगती पाहणाºया आमच्या मुलांनी सहलीला जावू नये म्हणून धमकावणारे नक्षलवादी हे स्वत:च्या मुलांना मात्र मोठ्या विद्यापीठात शिकवत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच नक्षलवादी हे गोरगरीब आदिवासींच्या मजुरीचा पैसा खंडणी म्हणून गोळा करतात व रेती, खनिज, रिअल इस्टेट मध्ये स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवतात ही वास्तव व विदारक परिस्थितीही सर्व कुटुंबियांनी मांडली.याचबरोबर जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प व दळणवळण सुविधा उभारुन आदिवासी बांधवांचा खºया अर्थाने विकास करावा, अशी मागणी देखील यावेळी नक्षलपीडित कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आलेल्या या पीडित कुटुंबियांमध्ये वृद्ध नागरिक, काही महिला तसेच मुलेही होती. या सर्वांच्या कुटुंबातील व्यक्ती नक्षली हिंसाचाराला बळी पडले आहेत. त्यांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते.४९१ निष्पाप आदिवासींच्या हत्येसाठी जबाबदार कोण?देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खून होऊनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा खडा सवाल नक्षलपीडित कुटुंबीयांनी निवेदनामध्ये केला आहे.मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरीने शस्त्रे देऊन देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाºया या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही सवाल कुटुंबियांनी केला.प्रथमच अशा पद्धतीने नक्षलपीडित कुटुंबीय शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करीत रस्त्यावर उतरल्यामुळे गडचिरोली नागरिक त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत होते. या शांतता रॅलीसाठी पोलिसांसह काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जागृती केली.