शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नक्षलपीडित कुटुंबीयांनी दिला शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:48 IST

गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया .....

ठळक मुद्देअहिंसा दिनानिमित्त रॅली : अधिकार देण्यासाठी शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया जिल्ह्याच्या विविध भागांतील नागरिकांनी सोमवारी अहिंसा दिनानिमित्त आपली व्यथा प्रशासनापुढे मांडत नागरिकांनाही शांतीचा संदेश दिला.शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्ह्यातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहीद कुटुंबीयांनी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ ‘नक्षलवाद मुदार्बाद’ च्या घोषणा देत आधी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चौकातून रॅली काढून नक्षल्यांकडून होणाºया त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.नक्षल्यांनी आतापर्यंत अनेक शाळा पाडल्या, मुलांचे शिक्षण रोखले. शासनाच्या महाराष्टÑ दर्शन सहलीच्या माध्यमातून राज्यातील इतर जिल्ह्यांची झालेली प्रगती पाहणाºया आमच्या मुलांनी सहलीला जावू नये म्हणून धमकावणारे नक्षलवादी हे स्वत:च्या मुलांना मात्र मोठ्या विद्यापीठात शिकवत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच नक्षलवादी हे गोरगरीब आदिवासींच्या मजुरीचा पैसा खंडणी म्हणून गोळा करतात व रेती, खनिज, रिअल इस्टेट मध्ये स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवतात ही वास्तव व विदारक परिस्थितीही सर्व कुटुंबियांनी मांडली.याचबरोबर जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प व दळणवळण सुविधा उभारुन आदिवासी बांधवांचा खºया अर्थाने विकास करावा, अशी मागणी देखील यावेळी नक्षलपीडित कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आलेल्या या पीडित कुटुंबियांमध्ये वृद्ध नागरिक, काही महिला तसेच मुलेही होती. या सर्वांच्या कुटुंबातील व्यक्ती नक्षली हिंसाचाराला बळी पडले आहेत. त्यांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते.४९१ निष्पाप आदिवासींच्या हत्येसाठी जबाबदार कोण?देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खून होऊनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा खडा सवाल नक्षलपीडित कुटुंबीयांनी निवेदनामध्ये केला आहे.मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरीने शस्त्रे देऊन देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाºया या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही सवाल कुटुंबियांनी केला.प्रथमच अशा पद्धतीने नक्षलपीडित कुटुंबीय शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करीत रस्त्यावर उतरल्यामुळे गडचिरोली नागरिक त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत होते. या शांतता रॅलीसाठी पोलिसांसह काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जागृती केली.