शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची अडचण वाढली : तीन महिन्यांचे एकत्रित बिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये विजेच्या मिटरची रिडिंग करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. काही ग्राहकांनी बिल भरले तर काहींनी मात्र बिल भरलेच नाही. लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.लॉकडाऊनच्या कालावधी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कालावधीत मिटर रिडिंगचेही काम बंद ठेवण्यात आले होते. स्वत: मिटर रिडिंग घेऊन ते महावितरणच्या अ‍ॅपवर टाकण्याची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली होती. मात्र या बाबातचे तांत्रिक ज्ञान ग्राहकांना नसल्याने बहुतांश ग्राहकांनी स्वत: मिटर रिडिंग केली नाही. ज्या ग्राहकांनी मिटर रिडिंग केली नाही. त्यांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा होता. तसेच संपूर्ण कुटुंब घरीच राहत होते. त्यामुळे कुलर, एसी, पंखे, टिव्ही या साधनांचा वापर वाढला होता. बील मात्र सरासरीच पाठविले जात होते. त्यामुळे वीज बिलातील तफावत वाढत गेली. काही ग्राहकांनी तर लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बिलाचा भरनासुद्धा केला नाही. त्यामुळे त्यांना आता तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. अशातच तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आल्याने ते भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांनी ते भरले नसल्याचे दिसून येते. घरगुती ग्राहकांकडून वीज बिलाची १० कोटी ९९ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ३ कोटी २८ लाख रूपयांचे बिल ग्राहकांनी भरले आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ५३ लाख रूपये भरले आहेत. औद्योगिक ग्राहकांककडून ९३ लाख रूपयांच मागणी होती. त्यापैकी १ कोटी ५० लाख रूपयांचा भरणा या ग्राहकांनी केला आहे.शंखांचे निरसन सुरूचप्रत्यक्ष वीज बिल वापराच्या तुलनेत अधिकचे बिल पाठविण्यात आले असल्याची शंका काही ग्राहकांना आहे. त्यामुळे ते महावितरणकडे तक्रारी करीत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निरसण व्हावे यासाठी महावितरण तर्फे वेळोवेळी वेबिणार आयोजित केले जात आहेत. तसेच तालुका स्तरावर तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्याही तक्रारींचे निरसन केले जात आहे.रोवणीच्या खर्चामुळे रखडली वीज बिलेजून महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. या महिन्यापासूनच खरीपच्या हंगामाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांकडे असलेल्या पैशातून त्यांनी खते, बियाणे खरेदी केली. तसेच धानाच्या रोवणीसाठी तजवीज करून ठेवली. त्यामुळे वीज बिल भरू शकले नाहीत. तर मजूर वर्ग लॉकडाऊनच्या कालावधीत बेरोजगार झाला होता. जमा असलेली पुंजी या कालावधीत संपली. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर रोजगार सुरू झाला. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत महावितरणला वीज बिलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :electricityवीज