शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची अडचण वाढली : तीन महिन्यांचे एकत्रित बिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये विजेच्या मिटरची रिडिंग करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. काही ग्राहकांनी बिल भरले तर काहींनी मात्र बिल भरलेच नाही. लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.लॉकडाऊनच्या कालावधी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कालावधीत मिटर रिडिंगचेही काम बंद ठेवण्यात आले होते. स्वत: मिटर रिडिंग घेऊन ते महावितरणच्या अ‍ॅपवर टाकण्याची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली होती. मात्र या बाबातचे तांत्रिक ज्ञान ग्राहकांना नसल्याने बहुतांश ग्राहकांनी स्वत: मिटर रिडिंग केली नाही. ज्या ग्राहकांनी मिटर रिडिंग केली नाही. त्यांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा होता. तसेच संपूर्ण कुटुंब घरीच राहत होते. त्यामुळे कुलर, एसी, पंखे, टिव्ही या साधनांचा वापर वाढला होता. बील मात्र सरासरीच पाठविले जात होते. त्यामुळे वीज बिलातील तफावत वाढत गेली. काही ग्राहकांनी तर लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बिलाचा भरनासुद्धा केला नाही. त्यामुळे त्यांना आता तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. अशातच तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आल्याने ते भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांनी ते भरले नसल्याचे दिसून येते. घरगुती ग्राहकांकडून वीज बिलाची १० कोटी ९९ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ३ कोटी २८ लाख रूपयांचे बिल ग्राहकांनी भरले आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ५३ लाख रूपये भरले आहेत. औद्योगिक ग्राहकांककडून ९३ लाख रूपयांच मागणी होती. त्यापैकी १ कोटी ५० लाख रूपयांचा भरणा या ग्राहकांनी केला आहे.शंखांचे निरसन सुरूचप्रत्यक्ष वीज बिल वापराच्या तुलनेत अधिकचे बिल पाठविण्यात आले असल्याची शंका काही ग्राहकांना आहे. त्यामुळे ते महावितरणकडे तक्रारी करीत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निरसण व्हावे यासाठी महावितरण तर्फे वेळोवेळी वेबिणार आयोजित केले जात आहेत. तसेच तालुका स्तरावर तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्याही तक्रारींचे निरसन केले जात आहे.रोवणीच्या खर्चामुळे रखडली वीज बिलेजून महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. या महिन्यापासूनच खरीपच्या हंगामाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांकडे असलेल्या पैशातून त्यांनी खते, बियाणे खरेदी केली. तसेच धानाच्या रोवणीसाठी तजवीज करून ठेवली. त्यामुळे वीज बिल भरू शकले नाहीत. तर मजूर वर्ग लॉकडाऊनच्या कालावधीत बेरोजगार झाला होता. जमा असलेली पुंजी या कालावधीत संपली. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर रोजगार सुरू झाला. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत महावितरणला वीज बिलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :electricityवीज