शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:03 IST

जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसंडे अँकर । आढावा सभेदरम्यान पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात शुक्रवारी विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, वडसाच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके आदी मान्यवर उपस्थित होते.आढावा सभेत जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदांची माहिती सादर केली. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वाची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदे रिक्त राहिल्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.रस्ता हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. रस्ते बनविताना रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी. कमीतकमी वेळेत ते कसे तयार होतील, याकडे लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याकरिता पथक तयार करण्यात येईल. कमी उंचीच्या पुलांमुळे पावसाळ्यात अतिदुर्गम भागातील रहदारी पूर्णपणे बंद होते. पुलाची उंची वाढविण्यास शासन निधी उपलब्ध करून देईल. दुर्गम भागात बांधकामाच्या निविदा कंत्राटदार भरत नाही. त्यामुळे विकासकामे होत नाही. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर छत्तीसगडच्या धरतीवर जिल्हा निर्माण समिती तयार करून ही समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. खत व बियाणांचा शेतकºयांना तुटवडा निर्माण होणार नाही, याकडे कृषी विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.तक्रार निवारण केंद्र स्थापन करणारनागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात हॅलो चंद्रपूर तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले. याच धरतीवर गडचिरोली जिल्ह्यातही हॅलो गडचिरोली तक्रार निवारण केंद्र स्थापन केले जाईल. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार