शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पक्के रस्ते ना सिमेंटच्या नाल्या; कोटापल्लीत गावात अनेक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:50 IST

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष: उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथे पक्के रस्ते, नालीचे बांधकाम झालेले नाही. गावात अनेक समस्या आहेत. त्यामुळे या समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कोटापल्ली येथील काही वॉर्डात २० वर्षांपूर्वी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. नाल्या पूर्णपणे तुंबल्यामुळे दुर्गंधी येत आहे. येथे ग्रामपंचायत असूनसुद्धा गावाचा विकास झालेला नाही. कोटापल्ली गावात २० वर्षांपूर्वी काही वॉर्डात नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर नवीन वस्ती वाढली; पण नवीन वॉर्डात अजूनपर्यंत नालींचे बांधकाम झालेले नाही. नाल्यांचा अभाव असल्याने बहुतांश ठिकाणी सांडपाणी साचून असते. बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत आहे. गावात रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. गावातील रस्ते पूर्णपणे उखडलेले आहेत. येथील काही नागरिकांच्या घरासमोर कचरा दिसतो. 

कार्यालयाला ग्रामसचिवांची दांडी

  • शंकर गग्गुरी यांच्या घरासमोर असलेल्या घाणीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक वेळा सांगूनही नाली सफाईकडे लक्ष दिल्याने शंकर गग्गुरी यांनी स्वतः नालीतील घाण स्वच्छ केली.
  • विशेष म्हणजे, येथील ग्रामसचिव मुख्यालयात राहत नाहीत. ते सातत्याने गैरहजर असतात. त्यामुळे गाव विकासात अडथळे येत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्षच झाले, असा आरोप नागरिकांचा आहे.

निधी खर्च होतो कुठे ?

  • रस्ते, नाली, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कोटापल्लीवासीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वातंत्र्याची सात दशके उलटूनही गावांमध्ये योग्य रस्ता नाही. 
  • पावसाळ्यात रस्त्यावर चिखल पसरलेला असतो. त्यामुळे गावातून साधी दुचाकीसुद्धा जाऊ शकत नाही. नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो; परंतु या समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करतात. 
  • शासनाकडून मिळणारा निधी खर्च कुठे होतो, असा आरोप नागरिकांचा आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली