शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही ...

ठळक मुद्देनवीन ४२ काेराेनाबाधितांची भर : सद्यस्थितीत ५१० रुग्ण शिल्लक

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही प्रमाणात बिनधास्त झाले. मात्र आता नवीन काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी गडचिराेली जिल्ह्यात नवीन ४२  बाधितांची भर पडली असून दिवसभरात ७४ जणांनी काेराेनावर मात  केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ८ हजार ४१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ७ हजार ४४८ वर पोहचली. तसेच सध्या ५१० क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील काेरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६३ टक्के, क्रियाशील रूग्णांचे प्रमाण ६.३४ टक्के तर मृत्यू दर १.०३ टक्के झाला. नवीन ४२ बाधितामध्ये गडचिरोली १५, अहेरी ५, आरमोरी ४, चामोर्शी  ८, धानोरा १, एटापल्ली २, कुरखेडा २, मुलचेरा १, देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ७४ रूग्णांमध्ये गडचिरोली ३७, अहेरी ४, आरमोरी १८, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, एटापल्ली ५, मुलचेरा २, कोरची १,  कुरखेडा ३ जणांचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदिरा नगर १, रामनगर १,  आंबेडकर वार्ड १, नवेगाव ३, इंदाळा १, साई नगर १,  सीआरपीएफ २,  कलेक्टर कॉलनी १, कारगीर चौक १, पोलीस कॉलनी १, विसापूर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक २, आलापल्ली १, नागेपल्ली १, महागाव १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये  देलोडा १, स्थानिक २, देऊळगाव १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये  बहादुरपुर १, भाडभीडी १, जयनगर १, स्थानिक २,  आष्टी २,  इल्लूर पेपरमिल १,  धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये शासकीय आश्रम शाळा १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, आष्टी १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये कडोली १, धानेगाव १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये  शिवाजी वाॅर्ड २,  भगतसिंग वाॅर्ड १, गिरोला १ जणाचा समावेश आहे.बाजारपेठेत नागरिक बनले बिनधास्तकाेराेना संदर्भात राज्य सरकारने अनलाॅक केल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील नागरिक नियमाबाबत बिनधास्त झाले आहेत. गडचिराेली येथील आठवडी बाजार व बाजारपेठेत बरेच नागरिक तसेच काही विक्रेते मास्कच्या वापराला पाठ दाखवित असल्याचे दिसून येते. दैनंदिन गुजरी बाजारातही विक्रेते व ग्राहकांमध्ये मास्कचा वापर पूर्वीसारखा आता दिसून येत नाही. काही माेजकेच लाेक मास्क लावून असल्याचे दिसतात.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या