शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीचे वनोद्यान बनले कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण्यात आली होती. कच्च्या रस्त्याच्या बाजुला विटा लावल्या होत्या.

ठळक मुद्देबगिचात वाढले गवत । कुंपण तोडून मोकाट जनावरांचा शिरकाव

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : लाखो रुपये खर्चून वन विभागाने कसनसूर मार्गावर २०१२ मध्ये तब्बल दोन हेक्टर जागेवर वनोद्यान उभारले. मात्र या वनोद्यानाकडे आता दुर्लक्ष झाले असल्याने वनोद्यानात गवत उगवले आहे. कुंपण तोडून मोकाट जनावरे वनोद्यानात चरताना दिसून येतात.वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण्यात आली होती. कच्च्या रस्त्याच्या बाजुला विटा लावल्या होत्या. या विटांना रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे वनोद्यान एटापल्ली येथील नागरिकांना आकर्षीत करीत होते.या वनोद्यानाची देखरेख करण्याकरिता वनमजूर नेमण्यात आला होता. त्याची २४ तास वनोद्यानात ड्युटी असायची. एटापल्ली येथील शेकडो नागरिक या उद्यानात फिरायसाठी जात होते. एटापल्ली शहराचे हे एक आकर्षण केंद्र बनले होते. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करून मागील दोन ते तीन वर्षांपासून या उद्यानाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील वनमजुराला हटविण्यात आल्याने देखभाल व दुरूस्ती करणारा एकही व्यक्ती आता शिल्लक नाही. त्यामुळे वनोद्यानात गवत उगवले आहे. मोकाट जनावरांनी फुलझाडे, औषधी वनस्पती फस्त केली आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.वन विभागाने उत्पन्नातून खर्च करावेगडचिरोली जिल्ह्यात वन विभाग हा सर्वात श्रीमंत असलेला विभाग आहे. जंगलातील लाकडे विकून दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा निधी वन विभागाकडे जमा होते. सदर जंगलाची देखरेख वन विभागासोबतच स्थानिक नागरिकांनीही केली आहे. त्यामुळे वन विभागाएवढाच स्थानिक नागरिकांचाही अधिकार आहे. वन विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही निधी बगिचाची देखभाल करण्यावर खर्च करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.सदर उद्यानाची निर्मिती तत्कालीन वन परिक्षेत्राधिकारी एस. एन. टेकाम यांच्या कालावधीत झाली. वनोद्यान बनविण्यासाठी या ठिकाणचे पूर्वीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यावेळी फार मोठा विरोध झाला. या विरोधाचा सामना करीत टेकाम यांनी अतिक्रमण हटवून वनोद्यान तयार केले. मात्र काही कालावधीतच वनोद्यानाची दुरवस्था झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एस. एम. टेकाम म्हणाले, उद्यानाची वाईट स्थिती बघून आपल्याला अतिशय दु:ख होत आहे. वन विभागाकडे निधी नसेल तर नागरिकांकडून तिकीट घेऊन वनोद्यानाची देखभाल करावी, असा सल्ला दिला.तारेचे कंपाऊंड तुटले आहे. निधी नसल्याने काहीच करता येत नाही. वन मजुरांकडून काम करण्याची मजुरीसुध्दा मंजूर होत नाही.- पी. एन. कुनघाडकर,क्षेत्र सहायक, एटापल्लीउद्यानाची देखभाल करावी यासाठी मागील पाच वर्षांपासून आपण वन विभागाकडे लेखी पाठपुरावा करीत आहोत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनमजूर वनाधिकाऱ्यांच्या घरी कामे करतात. तेच मजूर वनोद्यानात का लावले जात नाही?- महेश पुल्लूरवार,अध्यक्ष, व्यापारी संघटना एटापल्ली

टॅग्स :forest departmentवनविभाग