जोगीसाखरा येथील रोपवाटिकेमध्ये विद्युत खांब वादळी वाऱ्यामुळे पडला. त्यामुळे जोगीसाखरा ते आरमोरी वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसही जाऊ शकली नाही. बसला वडसामार्गे परत जावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांचे कामही रखडले. सदर खांब उचलण्यात यावा, अशी मागणी जोगीसाखरावासीयांनी केली आहे.
प्रवाशांचे बेहाल :
By admin | Updated: June 3, 2015 02:00 IST