शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

पेसा कायदा हा दुधारी शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:25 PM

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे,......

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन : धानोरात पेसा व वनहक्क कायद्यावर महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभा व धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अनुसूचित क्षेत्रातील पेसा व वनहक्क कायदा दिवसानिमित्त तालुका महोत्सव येथील माँ दंतेश्वरी देवस्थान परिसरात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोराचे माजी जमिनदार दौलतशहा मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, पं.स. सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, प्रकाश महाराज काटेंगे, माजी जि.प. सदस्य शांता परसे, काशिराम टेकाम, नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, नगसेविका रेखा हलामी, गीता वालको, मंगला मडावी, माधव गोटा, दौलत धुर्वे, केसरी उसेंडी, गाव पुजारी गणू जांगी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, पेसा कायद्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक आर्थिक स्तर उंचावलेला असून राजकारणातील पुढील दिशा दर्शविणारा कायदा आहे. आदिवासी मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आमदार डॉ. होळी म्हणाले, ग्रामसभेचा अध्यक्ष हा गावाचा विकास करणारा व्यक्ती असला पाहिजे. त्याचा कार्यकाळ तीन वर्ष असावा. विकास पुरूष अध्यक्ष राहिल्यास पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतून गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. पेसा क्षेत्रातील ग्रामसभा कोट्याधीश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे डॉ. होळी यावेळी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गोटा, संचालन सुरेश चौधरी यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी पेसा कायद्यातील तरतूदी व ग्रामस्थांनी स्वीकारावयाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. महोत्सवाला धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन ग्रामसभांनी घडविले.