शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:05 IST

जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी-चारा टंचाई नाही : वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईबाबत माहिती दिली. सप्टेंबर २०१८ च्या पाणी टंचाई अहवालाच्या आधारे जिल्ह्यात टंचाईचा टप्पा १ व २ मध्ये टंचाईसदृश परिस्थिती नसल्यामुळे निरंक पाणी टंचाई आराखडे सादर केले. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले, जिल्ह्यात गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांची संख्या ७ लाख ९४ हजार १५९ असून उपलब्ध चाऱ्याच्या स्त्रोतानुसार म्हणजेच वनक्षेत्र, बांधावरील, कृषिक्षेत्र आदी ठिकाणाहून वर्षभरात गोळा होत असलेला चारा पशुधनासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात टंचाई नाही, असे ते म्हणाले.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घेतली असल्याचे सांगितले.या बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषि अधीक्षक अनंत पोटे, उपसंचालक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, नरेगाचे बिडीओ एस.पी.पडघन, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावर्षी खरीपाचे क्षेत्र वाढणारजिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १५०२.३८ मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात १३५५.३१ अर्थात ९५.९३ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक १३५.१० टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी ७४.७८ टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १.५ लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात १.८२ लाख हेक्टरवर (११९ टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या २०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान, तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन ५५ टक्के अधिक मिळते, अशी माहिती यावेळी पालक सचिवांना देण्यात आली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली