शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:05 IST

जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी-चारा टंचाई नाही : वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईबाबत माहिती दिली. सप्टेंबर २०१८ च्या पाणी टंचाई अहवालाच्या आधारे जिल्ह्यात टंचाईचा टप्पा १ व २ मध्ये टंचाईसदृश परिस्थिती नसल्यामुळे निरंक पाणी टंचाई आराखडे सादर केले. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले, जिल्ह्यात गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांची संख्या ७ लाख ९४ हजार १५९ असून उपलब्ध चाऱ्याच्या स्त्रोतानुसार म्हणजेच वनक्षेत्र, बांधावरील, कृषिक्षेत्र आदी ठिकाणाहून वर्षभरात गोळा होत असलेला चारा पशुधनासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात टंचाई नाही, असे ते म्हणाले.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घेतली असल्याचे सांगितले.या बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषि अधीक्षक अनंत पोटे, उपसंचालक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, नरेगाचे बिडीओ एस.पी.पडघन, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावर्षी खरीपाचे क्षेत्र वाढणारजिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १५०२.३८ मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात १३५५.३१ अर्थात ९५.९३ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक १३५.१० टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी ७४.७८ टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १.५ लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात १.८२ लाख हेक्टरवर (११९ टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या २०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान, तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन ५५ टक्के अधिक मिळते, अशी माहिती यावेळी पालक सचिवांना देण्यात आली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली