शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:05 IST

जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी-चारा टंचाई नाही : वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईबाबत माहिती दिली. सप्टेंबर २०१८ च्या पाणी टंचाई अहवालाच्या आधारे जिल्ह्यात टंचाईचा टप्पा १ व २ मध्ये टंचाईसदृश परिस्थिती नसल्यामुळे निरंक पाणी टंचाई आराखडे सादर केले. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले, जिल्ह्यात गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांची संख्या ७ लाख ९४ हजार १५९ असून उपलब्ध चाऱ्याच्या स्त्रोतानुसार म्हणजेच वनक्षेत्र, बांधावरील, कृषिक्षेत्र आदी ठिकाणाहून वर्षभरात गोळा होत असलेला चारा पशुधनासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात टंचाई नाही, असे ते म्हणाले.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घेतली असल्याचे सांगितले.या बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषि अधीक्षक अनंत पोटे, उपसंचालक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, नरेगाचे बिडीओ एस.पी.पडघन, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावर्षी खरीपाचे क्षेत्र वाढणारजिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १५०२.३८ मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात १३५५.३१ अर्थात ९५.९३ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक १३५.१० टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी ७४.७८ टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १.५ लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात १.८२ लाख हेक्टरवर (११९ टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या २०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान, तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन ५५ टक्के अधिक मिळते, अशी माहिती यावेळी पालक सचिवांना देण्यात आली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली