शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

धान गंजीवर मोकाट जनावरांचा डल्ला

By admin | Updated: December 16, 2015 01:46 IST

परिसरात भाकड जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालकांना या जनावरांपासून कुठल्याही प्रकारचे काम करून घेता येत नाही.

वैरागड परिसरात धुमाकूळ : पशुपालकांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी हैराणवैरागड : परिसरात भाकड जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालकांना या जनावरांपासून कुठल्याही प्रकारचे काम करून घेता येत नाही. तसेच त्यांच्यापासून आर्थिक लाभही मिळत नाही. परिणामी पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडतात अथवा गुरांच्या कळपात सोडतात. मात्र कळपातून अंग काढून अनेक जनावरे हिरव्या दिसणाऱ्या चाऱ्याच्या शोधात शेत गाठून रबी पिकाची नासधूस करतात. सदर नित्यक्रम वैरागड परिसरात नेहमीच सुरू आहे. परंतु आता मोकाट जनावरांकडून धान गंजीचीही नासधूस करण्याचा सपाटा सुरू आहे. या मोकट जनावरांमुळे वैरागड परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. काही पशुपालक धानपीक निघल्याबरोबर जनावरे मोकाट सोडून देत आहेत. ही जनावरे धानाचे पुंजणे खाण्याबरोबरच रबी पिकांचेही नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वैरागड परिसरात धानाच्या कापणीनंतर बांधीत रबी पिकाचेही उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी शेत नांगरून उडीद, मूग, हरभरा, लाखोळी आदी पिकांची पेरणी केली आहे. त्याचबरोबर बांधीच्या पाऱ्यावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. काही पशुपालकांची क्षमता नसतानाही अधिकचे जनावरे पाळत आहेत. ही जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून दिली जात आहेत. या जनावरांकडून रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांना दिवस-रात्र पहारा देऊन पिकाची राखण करावी लागत आहे. अनेक शेतकरी मोकाट जनावरांमुळे त्रस्त होऊन रबी पिकांची पेरणी करीत नाही. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकल्यास ग्राम पंचायत प्रती गुरामागे २५० रूपये दंड आकारते. मात्र या २५० रूपयांपैकी २०० रूपये सहा महिन्यांनी परत मिळतात. त्यामुळे मोकाट पशुपालक सुद्धा या दंडाला जुमानत नसल्याची बाब अनेक शेतकरी बोलून दाखवित आहेत. शासनाने या दंडात दोन ते तीन पटीने वाढ करावी, अशी मागणी वैरागड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)