शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पानटपऱ्यांवरून पान झाले गायब!

By admin | Updated: March 30, 2015 01:23 IST

‘डॉन’ या चित्रपटात खईके पान बनारसवाला हे प्रसिध्द गाणे केवळ पानावर तयार करण्यात आले होते.

गडचिरोली : ‘डॉन’ या चित्रपटात खईके पान बनारसवाला हे प्रसिध्द गाणे केवळ पानावर तयार करण्यात आले होते. जुन्या पिढीतील अनेक लोक पान आवडीने खात होते. त्यामुळे पान विक्रीचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर व्हायचा. कालांतराने समाजात अनेक बदल घडत आले. ज्या पानटपऱ्यांवर पानाची पूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री व्हायची, त्या पानटपऱ्या आता केवळ खर्रे घोटण्याचे केंद्र झाले आहे. पानटपरीवरून ग्राहक नसल्याने पान तयार करण्याचे काम बंद झाले आहे. गडचिरोली शहरात ५०० वर पानठेले आहेत. तर जिल्ह्यात १० हजारावर पानटपऱ्या आहेत. यातील ७५ टक्के पानटपऱ्यांवर आता पानाची विक्रीच केली जात नाही. केवळ खर्रे घोटण्यासाठी सुपारी व आदी साहित्य ठेवले जाते. काही पानटपरी चालकांनी तर खर्रा घोटण्याच्या मशिन ठेवलेल्या आहेत. दिवसभर पाच ते सात किलो सुपारीचा खर्रा तयार करून ठेवला जातो. २० रूपयाला एक पुडी खर्रा विकला जातो. त्यामुळे पानठेल्यांवरून बंगला, बनारसी पान बंद झाले आहे. गडचिरोली शहरात खुल्या पानांची विक्री करणारे बारी समाजाचे अनेक नागरिक आहेत. परंतु त्यांचाही हा पांरपारिक व्यवसाय आता जुन्यासारखा राहिला नाही. काही पानठेल्यांवर १० रूपयाला एक पान विकल्या जाते. परंतु त्यांचा ग्राहक हा ठराविकच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)